शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
2
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
3
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
4
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
5
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
6
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा
7
भ्रष्टाचारावर 'महागडी' नजर! ७० लाखाच्या BMW कारमधून फिरणार लोकपाल; ड्रायव्हर्सनाही ट्रेनिंग
8
"मी सौदी अरेबियात अडकलोय, वाळवंटात उंट...", ढसाढसा रडत तरुणाने मागितली मोदींकडे मदत
9
IND vs AUS : Adam Zampa नं मारलेला 'चौकार' गंभीरचा 'सुंदर' डाव फसवा ठरवणारा?
10
Mumbai Fire: जोगेश्वरीमध्ये अग्नितांडव! जेएमएस बिझनेस सेंटरला भीषण आग, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरु
11
Meta Layoffs: आता AI कर्मचाऱ्यांनाच कपातीचा फटका! Mark Zuckerberg च्या एआय टीममधील शेकडो लोकांना नारळ
12
बॅटिंगवेळी रोहितची अय्यरसमोर 'बोलंदाजी'; "तो सातवी ओव्हर टाकतोय यार..." मैदानात नेमकं काय घडलं (VIDEO)
13
तुमच्या कुंडलीत आहे का महाभाग्य योग? अकल्पनीय यश, अमाप धन; अनपेक्षित लाभ, भाग्योदय-भरभराट!
14
जगातील 'या' देशांत १ लाख रुपये कमवाल तर भारतात येऊन मालमाल व्हाल! तुम्हाला माहीत आहे का?
15
बँकेकडून पर्सनल लोन अप्रुव्ह झालंय? तरी अ‍ॅग्रीमेंटवर सही करण्यापूर्वी 'या' गोष्टी नक्की तपासा, पाहा डिटेल्स
16
Rohit Sharma Record: हिटमॅन रोहितनं वेळ घेतला; मग पुल शॉटसह बॅक टू बॅक सिक्सर मारत सेट केला महारेकॉर्ड
17
"ते मनापासून बोलले, म्हणूनच..."; मराठी अभिनेत्री मेघा धाडेचा महेश कोठारेंना पाठिंबा, म्हणाली-
18
रशियाच्या अर्थकारणाला थेट धक्का; जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला!
19
Pak General On India: भारताची ताकद बघून पाकिस्तान हादरला! पाकिस्तानी जनरल म्हणाले, "आम्ही एकटे..."
20
Diwali Accident: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! १५० रुपयांची कार्बाइड गन बेतली जीवावर, १२५ जणांनी गमावली दृष्टी

७२ तासांत ६० हजारांवर शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचा आदेशही काढला होता.

ठळक मुद्देविमा कंपनीला साकडे : हजारो शेतकरी अद्यापही तहसीलपासून दूरच

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : क्यार वादळानंतर बरसलेल्या परतीच्या पावसाने राज्यभरात लाखो हेक्टरचे नुकसान झाले. जिल्ह्यात एक लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात भरून न निघणारी हानी झाली आहे. या शेतकऱ्यांनी भरपाईसाठी ७२ तासांच्या आत अर्ज सादर करण्याचे आदेश विमा कंपनीने काढले. जिल्ह्यात अशा तक्रारी दाखल करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे. गुरूवारच्या वादळी पावसाने हा आकडा लाखावर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर सूचना न मिळाल्याने अनेक शेतकºयांना तक्रार अर्जच दाखल करता आले नाहीत. हे शेतकरी आता तालुका कार्यालयात धडकत आहेत.वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना ७२ तासात कृषी विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी अथवा विमा कंपनीकडे तक्रार अर्ज दाखल करायचा होता. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचा आदेशही काढला होता. हा आदेश धडकताच शेतकऱ्यांनी तक्रारीचे अर्ज कृषी विभागाकडे देण्यास सुरूवात केली आहे.यातून तालुका कृषी कार्यालयात अर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. पंचनामे करण्यासाठी कुठलेही अधिकारी, कर्मचारी न पोहोचल्याने शेतकऱ्यांनीच आपले नुकसानीचे अर्ज कृषी विभागाकडे सादर केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची संख्या ६० हजारांवर पोहोचली आहे. त्यात गुरूवारी पुन्हा पाऊस बरसला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रार अर्जाची संख्या लाखावर पोहोचण्याची शक्यता आहे.उमरखेड तालुक्यातून ८५०० अर्ज दाखल झाले आहेत. महागाव तालुक्यातून ६४०० अर्ज आले आहेत. उमरखेड तालुक्यातून नऊ हजार अर्ज आले आहेत. दिग्रस तालुक्यातून ७००० हजार तक्रार अर्ज आले आहेत. आर्णी तालुक्यातून पाच हजार अर्ज दाखल झाले आहेत. दारव्हा तालुक्यात ३००० अर्ज आले आहेत. नेर तालुक्यात तक्रार दाखल करणाऱ्या अर्जांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. इतर तालुक्यातील अर्जांची छाननी केली जात आहे. एकूण ६० हजारांवर तक्रारी विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडे सोपविण्यात आल्या आहेत.नुकसान नियमांचा अवलंब होणारविमा कंपनी नुकसान भरपाई देताना स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या नियमानुसार भरपाई देणार आहे. ही रक्कम शेतकऱ्याने काढलेल्या विमा संरक्षित रकमेच्या काही टक्केच राहणार आहे. विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या अहवालानुसार काही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर दुसरीकडे तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांच्या संयुक्त पंचनाम्याच्या अहवालानुसार शेकºयांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले असेल तरच आपत्तीच्या नियमानुसार मदत मिळणार आहे. हे संयुक्त पंचनामे करताना विमा कंपनीच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सोयनुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थेट ऑनलाईन तक्रार नोंदविता येणार आहे. त्याकरिता त्यांना नुकसानीचे फोटो काढून ऑनलाईन तक्रारीची नोंद करावी लागणार आहे. सोबत विमा पॉलिसीची पावती आॅनलाईन पाठविण्याच्या सूचना विमा कंपनीने दिल्या आहेत.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती