शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

कोळसा मालधक्याने वणीकर त्रस्त

By admin | Updated: August 29, 2016 00:56 IST

शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी

प्रदूषणात वाढ : रेल्वेस्थानकही होतात विद्रुपवणी : शहरालगतच असलेला दगडी कोळशाचा मालधक्का वणीकरांना त्रस्त करून सोडत आहे. हा मालधक्का येथून हटविण्यासाठी वणीकर पाच वर्षांपासून सतत मागणी करीत आहे. मात्र रेल्वे मंत्रालयाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. जणू काही रेल्वे व वेकोली प्रशासनाने वणीकरांच्या आरोग्याशी खेळच मांडल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मालधक्का येथून लवकरच हटणार असल्याच्या वावड्या तीन वर्षांपासून खासदारांच्या तोंडून उडविला जात आहे. मात्र याला अजूनही मूर्त रूप आले नाही.इंग्रजाच्या काळापासून वणीला रेल्वेस्थानक आहे. विभागातील दगडी कोळसा व चूना भट्ट्यांचे उत्पादन विक्रमी होते. त्यामुळे त्याची वाहतूक करण्यासाठी येथे इंग्रजांनी रेल्वे स्थानकाची निर्मिती केली. कालांतराने येथून आदिलाबादपर्यंत रेल्वे लाईन टाकून वणीला मुंबईशी जोडण्यात आले. मात्र अनेक वर्षे या मार्गावरून प्रवासी रेल्वे सुरू झाली नाही. माजी रेल्वेमंत्री लालपुप्रसाद यादव यांनी वणीला रेल्वेच्या जाळ्यात विणले. येथून तीन रेल्वेगाड्या सुरू केल्या. मात्र त्यापैकी केवळ नंदीग्राम एक्सप्रेसचाच थांबा येथे देण्यात आला. रेल्वेस्टेशनचे रूप पालटले. मात्र या परिसरात असणाऱ्या १० कोळसा खाणीतून निघणारा कोळसा विद्युत केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकावरच मालधक्का बनविण्यात आला. ध्वनी व वायु प्रदूषणाचे भूत वणीकरांच्या मानगुटीवर बसले. ट्रकमधून कोळसा खाली टाकतात व तो रेल्वे वॅगनमध्ये भरताना कोळशाची धुळ हवेत उडतात. त्यामुळे रेल्वेस्टेशन परिसरातील घरे दररोज काळवंडतात. घराच्या छतावर व वाळायला टाकलेले कपडेसुद्धा दिवसभरात काळे पडतात, तर मग जनतेच्या हृदयात किती धुळ जात असेल, याचा अंदाज घेता येतो. तसेच जेसीबीने कोळसा उचलला जातो. त्या जेसीबीची घरघर रात्रंदिवस सुरू असते. या आवाजानेही जनता त्रस्त होत आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील गाड्यांचा थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळही वाढली आहे. परंतु रेल्वे स्टेशनवर बसावे कोठे, असा प्रश्न पडतो आहे. सर्वत्र कोळशाची धुळ साचलेली असते. बसणाऱ्यांच्या कपड्यालाही काळे डाग पडतातच. जर या त्रासातून वणीकरांची सुटका करायची असेल, तर येथील मालधक्का रेल्वेस्थानकापासून दूर नेणे गरजेचे आहे. यासाठी खासदार हंसराज अहीर यांनी रेल्वे मंत्र्यालयाला प्रस्तावही दिल्याचे समजते. रेल्वे मंत्रालयाने त्याला मंजुरात दिल्याचे अहीर यांनी वेळोवेळी वणीकरांना सांगितले. मालधक्यासाठी पेटूर ते कायर दरम्यानचे स्थळाची पाहणीही झाल्याचे सांगण्यात आले. मात्र अजूनही मालधक्का हटण्याचे चिन्ह दिसत नाही. आता अहीर यांना केंद्रात मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे रेल्वे मंत्रालयावरील वजनही वाढले आहे. आतातरी मालधक्का हटवून रेल्वे स्थानकाला व जनतेला सुरक्षितता मिळेल, अशी वणीकरांना आशा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)