शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे ‘एसपीं’पुढे आव्हान

By admin | Updated: January 21, 2017 01:27 IST

जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले

बहुतांश राजकीय आश्रयाला : नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतेय कामकाज यवतमाळ : जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. कारण बहुतांश पोलीस अधिकारी हे राजकीय आश्रयाला गेल्याने नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यातून सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एम. राज कुमार हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले आहेत. त्यांची ठाणेदारांशी तोंड ओळख झाली आहे. पहिल्या क्राईम मिटींगच्या वेळी या ठाणेदारांची कदाचित खरी ओळख होईल. ‘एसपी’ संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन आपली जिल्ह्याची हद्द तपासत आहेत. जिल्ह्यात सध्या सामाजिक शांतता आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. संघटित गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांपुढे राहणार आहे. कारण वणीपासून उमरखेडपर्यंतचे बहुतांश पोलीस अधिकारी राजकीय आश्रयाला आहेत. त्या बळावरच त्यांनी आपली सोईने नियुक्ती करून घेतली आहे. आजही ते आणखी सोईची पोस्टींग मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींना अमरावतीतून खुला ‘आशीर्वाद’ मिळतो आहे. काहींचे थेट वरपर्यंत लागेबांधे आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला ते फारसे जुमानत नसल्याचे बोलले जाते. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘वरकमाई’चे कारणामे खुलेआम सुरू आहे. त्याला गेल्या दोन वर्षात कठोरतेने प्रतिबंध घातला गेला नाही. कधी तसा प्रयत्नही केला असता राजकीय ‘इन्टरेस्ट’ त्यात आडवा आला. युतीची सत्ता असल्याने या पक्षाचे अनेक पदाधिकारी अशा ‘इन्टरेस्ट’च्या कामात ‘व्यस्त’ आहेत. त्यामुळे ठाणेदारांना जाब विचारायचा कुणी असा प्रश्न आहे. ही जबाबदारी आता नव्या पोलीस अधीक्षकांनाच पार पाडावी लागणार आहे. ठाणेदारांवर पोलीस प्रशासनाने आपला वचक निर्माण केल्यास निवडणुका शांततेत पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि आगामी सण-उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करणे कठीण नाही. (जिल्हा प्रतिनिधी)