शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
3
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
4
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
5
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
6
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
7
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
8
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
9
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
10
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
11
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
12
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
13
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
14
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
15
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
16
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
17
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
18
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
19
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
20
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...

ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे ‘एसपीं’पुढे आव्हान

By admin | Updated: January 21, 2017 01:27 IST

जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले

बहुतांश राजकीय आश्रयाला : नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतेय कामकाज यवतमाळ : जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. कारण बहुतांश पोलीस अधिकारी हे राजकीय आश्रयाला गेल्याने नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यातून सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एम. राज कुमार हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले आहेत. त्यांची ठाणेदारांशी तोंड ओळख झाली आहे. पहिल्या क्राईम मिटींगच्या वेळी या ठाणेदारांची कदाचित खरी ओळख होईल. ‘एसपी’ संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन आपली जिल्ह्याची हद्द तपासत आहेत. जिल्ह्यात सध्या सामाजिक शांतता आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. संघटित गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांपुढे राहणार आहे. कारण वणीपासून उमरखेडपर्यंतचे बहुतांश पोलीस अधिकारी राजकीय आश्रयाला आहेत. त्या बळावरच त्यांनी आपली सोईने नियुक्ती करून घेतली आहे. आजही ते आणखी सोईची पोस्टींग मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींना अमरावतीतून खुला ‘आशीर्वाद’ मिळतो आहे. काहींचे थेट वरपर्यंत लागेबांधे आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला ते फारसे जुमानत नसल्याचे बोलले जाते. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘वरकमाई’चे कारणामे खुलेआम सुरू आहे. त्याला गेल्या दोन वर्षात कठोरतेने प्रतिबंध घातला गेला नाही. कधी तसा प्रयत्नही केला असता राजकीय ‘इन्टरेस्ट’ त्यात आडवा आला. युतीची सत्ता असल्याने या पक्षाचे अनेक पदाधिकारी अशा ‘इन्टरेस्ट’च्या कामात ‘व्यस्त’ आहेत. त्यामुळे ठाणेदारांना जाब विचारायचा कुणी असा प्रश्न आहे. ही जबाबदारी आता नव्या पोलीस अधीक्षकांनाच पार पाडावी लागणार आहे. ठाणेदारांवर पोलीस प्रशासनाने आपला वचक निर्माण केल्यास निवडणुका शांततेत पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि आगामी सण-उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करणे कठीण नाही. (जिल्हा प्रतिनिधी)