शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे ‘एसपीं’पुढे आव्हान

By admin | Updated: January 21, 2017 01:27 IST

जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले

बहुतांश राजकीय आश्रयाला : नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतेय कामकाज यवतमाळ : जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत. आपल्या ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे पहिले आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. कारण बहुतांश पोलीस अधिकारी हे राजकीय आश्रयाला गेल्याने नेत्यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यातून सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कशी ठेवावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. एम. राज कुमार हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक लाभले आहेत. त्यांची ठाणेदारांशी तोंड ओळख झाली आहे. पहिल्या क्राईम मिटींगच्या वेळी या ठाणेदारांची कदाचित खरी ओळख होईल. ‘एसपी’ संवेदनशील ठिकाणांना भेटी देऊन आपली जिल्ह्याची हद्द तपासत आहेत. जिल्ह्यात सध्या सामाजिक शांतता आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्याचे आव्हान आहे. संघटित गुन्हेगारी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. मात्र ठाणेदारांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षकांपुढे राहणार आहे. कारण वणीपासून उमरखेडपर्यंतचे बहुतांश पोलीस अधिकारी राजकीय आश्रयाला आहेत. त्या बळावरच त्यांनी आपली सोईने नियुक्ती करून घेतली आहे. आजही ते आणखी सोईची पोस्टींग मिळविण्यासाठी प्रयत्नरत आहेत. यातील काहींना अमरावतीतून खुला ‘आशीर्वाद’ मिळतो आहे. काहींचे थेट वरपर्यंत लागेबांधे आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला ते फारसे जुमानत नसल्याचे बोलले जाते. सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ‘वरकमाई’चे कारणामे खुलेआम सुरू आहे. त्याला गेल्या दोन वर्षात कठोरतेने प्रतिबंध घातला गेला नाही. कधी तसा प्रयत्नही केला असता राजकीय ‘इन्टरेस्ट’ त्यात आडवा आला. युतीची सत्ता असल्याने या पक्षाचे अनेक पदाधिकारी अशा ‘इन्टरेस्ट’च्या कामात ‘व्यस्त’ आहेत. त्यामुळे ठाणेदारांना जाब विचारायचा कुणी असा प्रश्न आहे. ही जबाबदारी आता नव्या पोलीस अधीक्षकांनाच पार पाडावी लागणार आहे. ठाणेदारांवर पोलीस प्रशासनाने आपला वचक निर्माण केल्यास निवडणुका शांततेत पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आणि आगामी सण-उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करणे कठीण नाही. (जिल्हा प्रतिनिधी)