शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर

यवतमाळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. एका प्रकल्पामध्ये एक हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे रबी हंगामासाठी लागणारे बियाणे या प्रकल्पातून ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच खत आणि फवारणीसाठी लागणारे औषधी पुरविली जाणार आहे. एका शेतकऱ्याला साडेसात हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.यामाध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घातली जाणार आहे. कडधान्यक्षेत्रात वाढ करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना आहे. मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून हाती घेतला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कितपत उपयोगी पडतो यावर या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे. हा प्रकल्प योग्यरीत्या राबविला तर शेतकऱ्यांना रबी हंगामात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. (शहर वार्ताहर)