शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प

By admin | Updated: October 25, 2014 22:47 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर

यवतमाळ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर कडधान्य प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार मदत करणार असून रबी बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे.या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ४० प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. एका प्रकल्पामध्ये एक हजार हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. यानुसार जिल्ह्यात चार हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. विशेष म्हणजे रबी हंगामासाठी लागणारे बियाणे या प्रकल्पातून ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासोबतच खत आणि फवारणीसाठी लागणारे औषधी पुरविली जाणार आहे. एका शेतकऱ्याला साडेसात हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.यामाध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करणे आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर घातली जाणार आहे. कडधान्यक्षेत्रात वाढ करणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या बोजामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. अशा स्थितीत शासनाच्या विविध योजना आहे. मात्र त्याचा पाहिजे तसा उपयोग होत नाही. आता राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून हाती घेतला हा उपक्रम शेतकऱ्यांच्या कितपत उपयोगी पडतो यावर या प्रकल्पाचे भविष्य अवलंबून आहे. हा प्रकल्प योग्यरीत्या राबविला तर शेतकऱ्यांना रबी हंगामात मोठी मदत होणार आहे. त्यासाठी गरज आहे ती इच्छाशक्तीची. (शहर वार्ताहर)