शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शतकोटीतील वृक्षांचा पंचनामा

By admin | Updated: August 22, 2014 00:07 IST

शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती

२५० शाळा : १५ सप्टेंबरपर्यंत मोहीम यवतमाळ : शतकोटी वृक्ष लागवड योजनेत आतापर्यंत लाखो झाडे लावल्याचे दाखविले जात आहे. प्रत्यक्षात मात्र या वृक्षलागवडीचे मूल्यमापनच झाले नाही. २०११ पासून लावण्यात आलेल्या वृक्षापैकी प्रत्यक्षात किती जीवंत आहे, याचा पंचनामा गावपातळीवर करण्यात येणार आहे. ही मोहीम २५ आॅगस्टपासून हाती घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील अडीचशे शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांच्याकडून ही पडताळणी केली जाणार आहे. या कामी राष्ट्रीय हरितसेना लावण्यात येणार आहे. व्हीआर पॅटर्ननुसार वृक्षांची लागवड झाली की नाही. कार्यक्रम राबविताना प्रत्यक्षात किती वृक्षांची लागवड झाली आणि आज जीवंत असलेले वृक्ष याचे थेट वृक्षारोपण झालेल्या जागेवर जाऊन पाहणी केली जाणार आहे. एक प्रकारे या योजनेतील अपहार उघड करण्याचा हा प्रयत्न आहे. वृक्ष लागवडीच्या योजना कागदावरच राबविल्या जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. मात्र याची उलट तपासणी शासनस्तरावरून झाली नाही. त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी प्रत्यक्ष जीवंत किती याचा कुठलाही आकडा यंत्रणेजवळ उपलब्ध नाही. त्यामुळेच जिल्हास्तरावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक या समितीचे सचिव आहे. तर रोहयो उपजिल्हाधिकारी, उपमुख्याधिकारी पंचायत हे या समितीचे सदस्य आहे. या मूल्यमापनासाठी सर्वांनाच प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक गावातून जीवंत वृक्षांची माहिती गोळा केली जाणार आहे. यासाठी राष्ट्रीय हरितसेनेत काम करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०११-१२, २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षांमध्ये लागवड केलेले वृक्ष आणि आज त्यापैकी जीवंत असलेले वृक्ष याचा हा सर्वे आहे. विशेष म्हणजे ही मोहीम राबविताना संबंधित यंत्रणेकडून निकषांंचे पालन करण्यात आले की नाही, याचीही पडताळणी केली जाणार आहे. हा कार्यक्रम १५ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर दर्शनी भागातच वृक्ष लागवड केली आहे. त्यानंतर आकडे फुगवून केवळ कागदोपत्रीच हा कार्यक्रम उरकण्यात आला आहे. आता या वृक्ष लागवडीची उलट तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये शतकोटी वृक्ष लागवड योजनेतील बोगसपणा उघड होणार आहे. आजपर्यंत दिशाभूल करणारी आकडेवारी दाखविल्याबद्दल कुणावरही कारवाई झालेली नाही. (कार्यालय प्रतिनिधी)