शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

जातीव्यवस्था माणुसकीला नख लावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.

ठळक मुद्देअशोक बुरबुरे : आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयोजनात व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जातीव्यवस्था ही माणुसकीला नख लावते आणि माणसाला माणसातून वजा करते. जोपर्यंत ती समूळ नष्ट होणार नाही तोपर्यंत जाती निर्मूलनाचे काम सुरूच ठेवावे लागेल. सर्वप्रथम विषमतेला छेद देण्यासाठी अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धाने जगाला दिलेल्या समताधिष्ठित विचारमूल्यांची पेरणी सातत्याने करीत राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत व कवी, कलावंत अशोक बुरबुरे यांनी केले.येथील आझाद मैदानात आयोजित स्मृती पर्वात आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या संयोजनातील व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘जातीचे निर्मूलन : बौद्ध समाज निर्मिती : शोध आणि बोध’ या विषयाला अनुसरून त्यांनी मार्गदर्शन केले.जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली देतात. यामध्येच जातिभेद आहे किंवा नाही? या प्रश्नाचे रहस्यमयी उत्तर दडलेले आहे.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरुण जनबंधू होते. प्रमुख पाहुणे डॉ. विवेक गुजर, डॉ. महेंद्र पखाले, डॉ. श्रीकांत मेश्राम, अजय गौरकार, इंजी. घनश्याम भारशंकर, इंजी. भीमराव गायकवाड, इंजी. संजय मानकर, अकादमीचे अध्यक्ष गोपिचंद कांबळे, सचिव आनंद गायकवाड, स्मृति पर्व व आयोजन समितीचे ज्ञानेश्वरराव गोरे, विलास काळे यांची उपस्थिती होती.समारोपीय सत्राच्या प्रारंभी येथील सुप्रसिद्ध गायक कलावंत घनश्याम पाटील आणि संचाने भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे निवेदन कवी विनय मिरासे यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका प्रा. संदीप नगराळे यांनी मांडली. प्रास्ताविक अकादमीचे प्राध्यापक विलास भवरे यांनी केले. आनंद गायकवाड यांच्या बीज भाषणानंतर नीरज वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. कवडू नगराळे व सुनील वासनिक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. नीलेश सोनटक्के यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता आंबेडकरी साहित्य कला अकादमीचे डॉ.प्रा. युवराज मानकर, डॉ. सुभाष जमदाडे, डॉ. साहेबराव कदम, सुमेध ठमके, आनंद धवणे आदींनी पुढाकार घेतला.