शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

कार्लीच्या सिंचन तलावाला पडले भगदाड

By admin | Updated: December 26, 2016 01:49 IST

गावाला धोका, रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले नवीन संकट

 तलाव ७० टक्के रिकामा : गावाला धोका, रबीच्या सिंचनावर प्रश्नचिन्ह, शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले नवीन संकट रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावर कार्ली गावाजवळ जिल्हा परिषदेचे सिंचन तलाव बांधण्यात आले. या सिंचन तलावाला मोठे भगदाड पडले आहे. यातून धो-धो पाणी वाहत आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी सिंचन विभागाकडे तक्रारी दिल्या. मात्र भगदाड बुजविण्यासाठी शासनाने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत. यामुळे सिंचन तलावातील ७० टक्के पाणी आता वाहून गेले आहे. हे भगदाड गावकऱ्यांनी स्वत:च बुजविले असले तरी पाण्याचा अखंड झरा सुरूच आहे. यामुळे लाखो रूपयांचा निधी खर्च करून उभारलेल्या तलावाला भगदाड पडल्याने गावाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. रबीच्या सिंचनाचे स्वप्नही पाण्यासोबतच वाहून गेले. यवतमाळ शहरापासून १५ किमी अंतरावर कार्ली गाव आहे. या गावातील उंच ठिकाणावर सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. १९९० च्या सुमारास हे तलाव उभारण्यात आल्याचे गावकरी सांगतात. त्यावेळी तलावाच्या निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात ओलित होणार असल्याचे स्वप्न गावकऱ्यांना दाखविण्यात आले. सिंचन तलावात त्याकरिता स्वतंत्र जॅकवेल उभारण्यात आला आहे. या ठिकाणावरून मुख्य कालव्यापर्यंत लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली. जॅकवेल खुले केल्यानंतर त्यातून कॅनलच्या नाल्यात पाणी सोडले जाणार होते. साधारणत: १९९४-९५ मध्ये पाणी सोडण्यात आले. यातून लोकांनी त्या काळात ओलित केले. दोन वर्षे सिंचन झाले. त्यानंतर कॅनलचा पाईप बुजल्याचे कारण सांगत पाणी सोडण्याचे काम थांबविण्यात आले. नंतर जॅकवेल खराब झाल्याचे कारण सांगण्यात आले. तेव्हापासून सिंचनाचा प्रयत्नच झाला नाही. केवळ सिंचन तलावात पाण्याची साठवणूक होत होती. काही दिवसांपूर्वी या तलावाला भगदाड पडले. यातून थोडे-थोडे पाणी जात होते. अलीकडे हे भगदाड मोठे झाले. यातून धो-धो पाणी वाहायला सुरूवात झाली. गावकऱ्यांनी सिंचन विभागाकडे तक्रार नोंदविली. मात्र कुणी या तलावाकडेही फिरकले नाही. यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत मोठे दगड, माती, टाकून ते बुजविण्याचा प्रयत्न केला. यानंतरही पाण्याची धार सुरूच आहे. पूर्वीच्या प्रमाणात हे पाणी कमी आहे. मात्र येत्या पावसाळ्यात या तलावाची भिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तलावखाली वसलेल्या गावांना धोका आहे. तलावाच्या दुरूस्तीच्या उपाययोजना झाल्या नाही. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत. लाखोंचा खर्च पाण्यात जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी सिंचन तलाव उभारण्यात आले. त्यावर लाखोंचा निधी खर्च झाला. तलावाच्या निर्मितीनंतर त्याकडे दुर्लक्ष झाले. छोट्या उपाययोजनाही झाल्या नाही. यामुळे मुळ उद्देशालाच तडा गेला आहे. यातून सिंचन झालेच नाही. यामुळे ज्या भागात तलाव बांधण्यात आले. त्या ठिकाणचे उत्पादनही वाढले नाही. यातून लाखोंचा निधी पाण्यात गेला. या ठिकाणच्या तलावाला पूर्वी छोटे भगदाड होते. आता हे भगदाड मोठे झाले. मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. यासंदर्भात कुठल्याही विभागाने लक्ष दिले नाही. शेवटी गावकऱ्यांनी हे भगदाड बुजविले. - वैशाली अंजीकर, माजी सरपंच कार्ली