शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

By admin | Updated: December 30, 2015 02:58 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना ....

तुरीचे भाव पाडले : मुक्कामी शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव नाहीहिवरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना व्यापारी मनात येईल तेथून मालांचा लिलाव करतात. सोमवारी सकाळी तुरी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच केला नाही. मंगळवारीही दुपारी उशिरा त्याच दिवशी आलेल्या शेतमालाचा लिलाव केला. लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तब्बल दीड हजार रुपयांनी तुरीचे भाव कमी केले आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथून विलास कोवरे, पुंडलिक राऊत, प्रकाश सोनकर, बारडतांडा येथून पंकज पवार, भारत जाधव, पिंपळगाव येथून मिलिंद गावंडे, लोणी येथून शिवलाल पवार, करळगाव येथून विश्वनाथ ठाकरे, मडकोना येथून शंकर गुल्ले, भास्कर धोटे, सुरज धोटे, रामचंद्र मेश्राम, विलास लोकासे, ईश्वर पेंदोर, बोरगाव लिंगा येथून श्रीकृष्ण घाटे, हरिशचंद्र ढोरे हे शेतकरी तूर विकण्यासाठी सोमवारी सकाळीच आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून बाजार समितीत आले. मात्र व्यापाऱ्यांनी त्या दिवशी त्यांच्या तुरीचा लिलावच केला नाही. शेतकऱ्यांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना परतवून लावले. मंगळवारी दुपारी लिलाव होणे अपेक्षित होता. मात्र याही दिवशी उशिरा ३ ते ४ वाजता लिलावाला सुरुवात केली. त्यातही सोमवारपासून मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना वगळून सुरुवातीला मंगळवारी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव करण्यात आला. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता जाणीवपूर्वक तुरीचे भाव कमी करण्यात आले. सोमवारपर्यंत नऊ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने जात असलेली तूर मंगळवारी चक्क आठ हजार ३७० रुपयाने खरेदी केली. एका दिवशी हजार ते १५०० रुपयांची तूट व्यापाऱ्यांनी आणली. बाजार समितीत प्रशासक नेमले असून त्यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. येथील सचिव व कर्मचारीवर्गसुद्धा पूर्णत: व्यापारीधार्जीना आहे. अडते व व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम या बाजार समितीत केले जात आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कसे नाडवता येईल, याचाच पुरेपूर प्रयत्न येथील यंत्रणेकडून केला जातो. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक नित्याचीच झालेली आहे. या बाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतमालाची खरेदी करताना अडते व व्यापारी आपल्या मर्जीनेच कारभार करतात. बाजार समितीत शेतकरी हितासाठी कोणतीच नियमावली नाही. यातूनच मोठी अनागोंदी येथे सुरू आहे, असा आरोप मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)