शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

यवतमाळ बाजार समितीत व्यापाऱ्याची मनमानी

By admin | Updated: December 30, 2015 02:58 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना ....

तुरीचे भाव पाडले : मुक्कामी शेतकऱ्यांच्या मालाचा लिलाव नाहीहिवरी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्णत: व्यापाऱ्यांची मनमानी सुरू आहे. शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचा क्रमवारीनेच लिलाव करणे अपेक्षित असताना व्यापारी मनात येईल तेथून मालांचा लिलाव करतात. सोमवारी सकाळी तुरी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मालाचा लिलावच केला नाही. मंगळवारीही दुपारी उशिरा त्याच दिवशी आलेल्या शेतमालाचा लिलाव केला. लिलाव करताना व्यापाऱ्यांनी तब्बल दीड हजार रुपयांनी तुरीचे भाव कमी केले आहे. यवतमाळ तालुक्यातील भांबराजा येथून विलास कोवरे, पुंडलिक राऊत, प्रकाश सोनकर, बारडतांडा येथून पंकज पवार, भारत जाधव, पिंपळगाव येथून मिलिंद गावंडे, लोणी येथून शिवलाल पवार, करळगाव येथून विश्वनाथ ठाकरे, मडकोना येथून शंकर गुल्ले, भास्कर धोटे, सुरज धोटे, रामचंद्र मेश्राम, विलास लोकासे, ईश्वर पेंदोर, बोरगाव लिंगा येथून श्रीकृष्ण घाटे, हरिशचंद्र ढोरे हे शेतकरी तूर विकण्यासाठी सोमवारी सकाळीच आठवड्याचा पहिलाच दिवस म्हणून बाजार समितीत आले. मात्र व्यापाऱ्यांनी त्या दिवशी त्यांच्या तुरीचा लिलावच केला नाही. शेतकऱ्यांनी जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांना परतवून लावले. मंगळवारी दुपारी लिलाव होणे अपेक्षित होता. मात्र याही दिवशी उशिरा ३ ते ४ वाजता लिलावाला सुरुवात केली. त्यातही सोमवारपासून मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना वगळून सुरुवातीला मंगळवारी आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचा लिलाव करण्यात आला. मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता जाणीवपूर्वक तुरीचे भाव कमी करण्यात आले. सोमवारपर्यंत नऊ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने जात असलेली तूर मंगळवारी चक्क आठ हजार ३७० रुपयाने खरेदी केली. एका दिवशी हजार ते १५०० रुपयांची तूट व्यापाऱ्यांनी आणली. बाजार समितीत प्रशासक नेमले असून त्यांच्याकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. येथील सचिव व कर्मचारीवर्गसुद्धा पूर्णत: व्यापारीधार्जीना आहे. अडते व व्यापाऱ्यांचे हितसंबंध जोपासण्याचे काम या बाजार समितीत केले जात आहे. शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना कसे नाडवता येईल, याचाच पुरेपूर प्रयत्न येथील यंत्रणेकडून केला जातो. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील बाजार समितीत शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक नित्याचीच झालेली आहे. या बाबत तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतमालाची खरेदी करताना अडते व व्यापारी आपल्या मर्जीनेच कारभार करतात. बाजार समितीत शेतकरी हितासाठी कोणतीच नियमावली नाही. यातूनच मोठी अनागोंदी येथे सुरू आहे, असा आरोप मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)