शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

बसस्थानक खड्डामय

By admin | Updated: October 31, 2015 00:23 IST

एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे.

शारीरिक वेदना : लाखो नागरिकांची वर्दळ असतानाही सातत्याने दुर्लक्षयवतमाळ : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नवीन राहिली नाही. आता तर त्यांना शारीरिक वेदनाही सहन कराव्या लागत आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात खड्ड्यांचा पसारा आहे. बस बाहेर काढताना चालकांना करावी लागणारी कसरत जीवावर बेतण्याचीही भीती आहे. संपूर्ण बसस्थानकातील गिट्टी उखडून मोठमोठे खड्डे तयार झालेले आहे. अर्धा ते एक फूट खोल आणि आठ ते दहा फूट रूंद असे अनेक खड्डे याठिकाणी आहे. धामणगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि बसस्थानकाबाहेर निघणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे याचा पुरावा देत आहे. या बसस्थानकात राज्यातील जवळपास भागातून बसेस येतात. त्यात ठिकठिकाणचे प्रवासी असतात. एखाद्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यालाही लाजवेल, अशी स्थिती बसस्थानक परिसराची आहे. चांगला भाग शोधूनही सापडत नाही. कुठे कुठे तर मोठमोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. त्यातून भरधाव बस मार्ग काढते त्यावेळी प्रवाशांना जीव मुठीत घ्यावा लागतो. गेली अनेक वर्षांपासून बसस्थानक परिसराची दुरुस्ती झालेली नाही. साधी डागडुजीही करण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविले गेले नाही. एकीकडे प्रवासी मिळत नसल्याची ओरड महामंडळाकडून केली जाते. परिणामी हा विभाग सातत्याने तोट्यात जात आहे. मात्र त्याच्या कारणांचा केवळ पाढा वाचला जातो. थातुरमातूर उपाय करून झालेल्या चुकांवर पांघरूण घातले जाते. प्रत्यक्ष कशामुळे नुकसान होत आहे याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. यातीलच खड्डामय झालेले बसस्थानक हे एक कारण आहे. बसस्थानकाच्या बहुतांश भागात पसरलेली दुर्गंधी प्रवासी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. राळेगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस लागणारा भाग, धामणगावसाठी असलेल्या प्लाटफार्म परिसराची झालेली दैना हा गंभीर विषय आहे. बसस्थानक प्रमुख किंवा आगार प्रमुखाकडून या बाबीची पाहणी कधीही होत नसावी, हे यावरून स्पष्ट होते. हजारो नागरिक पाणी पित असलेल्या भागातील परिस्थिती तर याहीपेक्षा गंभीर आहे. कित्येक वर्षेपर्यंत याठिकाणच्या जलकुंभाची साफसफाई झालेली नसावी हे स्पष्टपणे दिसून येते. खड्डामय झालेला बसस्थानक परिसर, निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, अनियमित बसफेऱ्या आदी कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विभाग नियंत्रकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)