शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

बसस्थानक खड्डामय

By admin | Updated: October 31, 2015 00:23 IST

एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे.

शारीरिक वेदना : लाखो नागरिकांची वर्दळ असतानाही सातत्याने दुर्लक्षयवतमाळ : एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त यवतमाळ बसस्थानकाची केविलवाणी अवस्था झाली आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय ही बाब नवीन राहिली नाही. आता तर त्यांना शारीरिक वेदनाही सहन कराव्या लागत आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात खड्ड्यांचा पसारा आहे. बस बाहेर काढताना चालकांना करावी लागणारी कसरत जीवावर बेतण्याचीही भीती आहे. संपूर्ण बसस्थानकातील गिट्टी उखडून मोठमोठे खड्डे तयार झालेले आहे. अर्धा ते एक फूट खोल आणि आठ ते दहा फूट रूंद असे अनेक खड्डे याठिकाणी आहे. धामणगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस आणि बसस्थानकाबाहेर निघणाऱ्या प्रवेशद्वारासमोरील खड्डे याचा पुरावा देत आहे. या बसस्थानकात राज्यातील जवळपास भागातून बसेस येतात. त्यात ठिकठिकाणचे प्रवासी असतात. एखाद्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यालाही लाजवेल, अशी स्थिती बसस्थानक परिसराची आहे. चांगला भाग शोधूनही सापडत नाही. कुठे कुठे तर मोठमोठ्या नाल्या तयार झालेल्या आहेत. त्यातून भरधाव बस मार्ग काढते त्यावेळी प्रवाशांना जीव मुठीत घ्यावा लागतो. गेली अनेक वर्षांपासून बसस्थानक परिसराची दुरुस्ती झालेली नाही. साधी डागडुजीही करण्याचे सौजन्य संबंधित विभागाकडून दाखविले गेले नाही. एकीकडे प्रवासी मिळत नसल्याची ओरड महामंडळाकडून केली जाते. परिणामी हा विभाग सातत्याने तोट्यात जात आहे. मात्र त्याच्या कारणांचा केवळ पाढा वाचला जातो. थातुरमातूर उपाय करून झालेल्या चुकांवर पांघरूण घातले जाते. प्रत्यक्ष कशामुळे नुकसान होत आहे याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. यातीलच खड्डामय झालेले बसस्थानक हे एक कारण आहे. बसस्थानकाच्या बहुतांश भागात पसरलेली दुर्गंधी प्रवासी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. राळेगाव मार्गावर धावणाऱ्या बसेस लागणारा भाग, धामणगावसाठी असलेल्या प्लाटफार्म परिसराची झालेली दैना हा गंभीर विषय आहे. बसस्थानक प्रमुख किंवा आगार प्रमुखाकडून या बाबीची पाहणी कधीही होत नसावी, हे यावरून स्पष्ट होते. हजारो नागरिक पाणी पित असलेल्या भागातील परिस्थिती तर याहीपेक्षा गंभीर आहे. कित्येक वर्षेपर्यंत याठिकाणच्या जलकुंभाची साफसफाई झालेली नसावी हे स्पष्टपणे दिसून येते. खड्डामय झालेला बसस्थानक परिसर, निर्माण झालेले घाणीचे साम्राज्य, अनियमित बसफेऱ्या आदी कारणांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विभाग नियंत्रकांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)