शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पुसद नगरपरिषदेची ८५ वर्षांपासून हद्दवाढ नाही

By admin | Updated: February 11, 2017 00:22 IST

राज्याच्या राजकारणात कायम दबदबा असलेल्या पुसद नगरपरिषदेच्या स्थापनेपासून अर्थात

सात ग्रामपंचायतींचा बोजा : नागरी सुविधा देताना दमछाक पुसद : राज्याच्या राजकारणात कायम दबदबा असलेल्या पुसद नगरपरिषदेच्या स्थापनेपासून अर्थात ८५ वर्षात एकदाही हद्दवाढ झाली नाही. परिणामी लगतच्या सात ग्रामपंचायतींचा दाब पुसद शहराला सहन करावा लागतो. शहराएवढीच लोकसंख्या लगतच्या ग्रामपंचायतीची असल्याने विकास नियोजनाचा बोजवारा उडतो. शहराच्या हद्दवाढीसाठी वारंवार प्रयत्न झाले तरी अद्यापही यश मात्र आले नाही. पुसद नगरपरिषदेला ब वर्ग दर्जा असून या नगरपरिषदेची स्थापना १४ आॅक्टोबर १९३२ साली झाली. त्यावेळी विरळ वस्ती असलेल्या पुसद शहरात विविध विकास कामे झाली. कालांतराने या शहराने हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक आणि जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने दोन मुख्यमंत्री दिले. त्यांच्या कार्यकाळात पुसद शहराचा मोठा विकास झाला. या विकासामुळे पुसद शहराची लोकसंख्या वाढली. यासोबतच शहरालगतच्या ग्रामपंचायतीतही नागरिक वसाहत करून राहू लागले. दोन दशकात तर विविध ले-आऊट निर्माण होऊन पुसद लगतच्या ग्रामीण भागाची लोकसंख्या वाढत गेली. श्रीरामपूर - काकडदाती, गायमुखनगर, शेलू (नाईक), वालतूर रेल्वे, कवडीपूर, धनकेश्वर, बोरगडी या ग्रामपंचायतीत नागरी सुविधा मिळत असल्याने येथील लोकसंख्या फोफावत आहे. पुसद शहरात जमिनीचे भाव वाढल्याने नवीन घर बांधण्यासाठी लगतच्या ग्रामपंचायतीकडे नागरिक धाव घेताना दिसत आहे. पुसद शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ७३ हजार ४६ आहे. तर लगतच्या सात ग्रामपंचायतींची सुमारे ७० हजारांच्या आसपास लोकसंख्या आहेत. तसेच तालुक्यातून कामाच्या निमित्ताने दहा हजारांवर नागरिक दररोज पुसद शहरात येतात. शहराच्या मूळ लोकसंख्ये एवढीच लोकसंख्या येथे विविध कारणाने कमी जास्त प्रमाणात येत असल्याने त्याचा दाब शहरातील विविध यंत्रणेला सोसावा लागतो. त्यातही सर्वाधिक दाब असतो तो नगरपरिषदेवर. दैनंदिन शहर स्वच्छतेचे आणि विकास कामाचे नियोजन करताना इतकीच लोकसंख्या निर्धारित केली जाते. प्रत्यक्षात मात्र शहरालगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिक दिवसभर नगरपरिषद क्षेत्रात विविध कामाने ठाण मांडून असतात. या अतिरिक्त लोकसंख्येचा भार नगरपालिकेने नियोजित केलेल्या कामांच्या यंत्रणेवर पडतो. परिणामी दैनंदिन स्वच्छतेसह इतर सोईसुविधांचा बोजवारा उडतो. शहरात येणाऱ्या अतिरिक्त लोकसंख्येला गृहित धरुन कामाचे नियोजन करताना आर्थिक अडचण येते. ही मर्यादा लक्षात घेऊन नियोजन केले जाते. त्या उपरही समस्या कायमच राहतात. पालिकेची यंत्रणा सक्षम करण्यासाठी शहरालगतच्या ग्रामपंचायतीचे विलिनीकरण करणे हाच एकमेव उपाय आहे. शिवाय हे ग्रामपंचायत क्षेत्र पालिकेत आल्यास उत्पन्नात भर पडणार आहे. पुसद शहरात असलेल्या शासकीय कार्यालयात कामकाजाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकही सकाळपासून सायंकाळपर्यंत येतात. त्याचा दाब शहराला सोसावा लागत आहे. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाली. त्यावेळेस पुसद नगरपरिषदेच्या हद्दवाढीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पुसद शहराची हद्दवाढ झाल्यास लगतच्या ग्रामपंचायती शहरात समाविष्ठ होतील. तसेच या ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना रस्ते, पाणी, वीज आदी नागरी सुविधा मिळतील. तसेच पुसद नगरपरिषदेच्या विकास नियोजनासाठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळणार आहे. यासाठी गरज आहे ती वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याची. (कार्यालय चमू)