शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

देशासाठी निधडी छाती... प्राणही घेऊ हाती!

By admin | Updated: January 7, 2017 00:31 IST

एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो.

देशप्रेम... एवढा एकच शब्द जाती-धर्मात दुभंगलेल्या नागरिकांना एका सुत्रात बांधण्यासाठी पुरेसा ठरतो. सैनिकांच्या छावण्यांमध्ये शिस्तीसोबतच हा सामाजिक सौहार्दही शिगोशिग पाहायला मिळतो. या देखावा पाहण्यासाठी सीमेवरच गेले पाहिजे असे नाही. नागरी भागात होणाऱ्या सैन्यभरतीच्या ठिकाणीही हे चित्र दिसते. गुरुवारी मध्यरात्रीपासून यवतमाळात सुरू झालेली सैन्यभरतीही त्यातलीच कडी. रात्री दीड वाजता भयंकर थंडी, त्यात विशीतले तरुण निधडी छाती उघडी करून शारीरिक चाचण्यांसाठी सज्ज... छाती, उंची मोजून झाल्यावर उंच उडी, धावण्याच्या कसोट्यांवरही प्राण पणास लावून खरे उतरले. मनात महत्त्वाकांक्षेचा दारूगोळा अन् डोळ्यापुढे एकच लक्ष्य, देशसेवा करायची आहे! यवतमाळ : विदर्भस्तरीय सैन्य भरतीसाठी यावेळी यवतमाळ शहराला लष्कराकडून मान देण्यात आला आहे. येथील जवाहरलाल नेहरू जिल्हा क्रीडा संकुलात ही भरती प्रक्रिया ७ जानेवारीपासून सुरू झाली आहे. येत्या १७ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. प्रत्यक्षात गुरुवारी मध्यरात्रीपासूनच प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच गोधणी रोडचा परिसर तरुणांच्या जथ्थ्यांनी गजबजून गेला. रात्री दीड वाजता या तरुण उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी सुरू झाली. नंतर होणाऱ्या शारीरिक चाचण्यांसाठी विद्यार्थ्यांचे नियोजनबद्ध गट तयार करण्यात आले. सकाळ होता-होता ही शारीरिक चाचणी सुरू झाली. एका रांगेत शिस्तबद्ध उभे असलेले तरुण एक-एक करुन पुढे आले. त्यांची उंची मोजण्यात आली. उंची मोजताक्षणी लष्करी अधिकारी जोरात ओरडून त्यांची उंची सांगायचा, दुसरा अधिकारी नोंदवून घ्यायचा. लगेच उमेदवाराचे वजन मोजले गेले. त्यानंतर पाठोपाठ छातीचे माप घेतले गेले. वजनमापात बसलेल्या तरुणांपुढे नंतरचे आव्हान होते उंच उडीचे. ९ फूट खड्ड्यावरून उडी मारण्याचे हे आव्हानही जवान पार करून गेले. त्यानंतर काही क्षणात ‘पुल अप्’करिता रेडी व्हायचे होते. उंच सिंगल बार धरून उमेदवारांना कमीत कमी १० वेळा ‘अप डाउन’ करण्याचा निकष आहे. नुसते १० पुल अप मारणेच पुरेसे नाही तर ते पुल अप कशा पद्धतीने एखादा उमेदवार मारतो, त्यावरही लष्करी अधिकाऱ्यांची करडी नजर आहे. पण बहुतांश नवजवानांनी हा टप्पाही लिलया पार केला. सर्वात महत्त्वाची कसोटी आहे रनिंगची. यात १६०० मीटर (१.६ किलोमीटर) अंतर अवघ्या ५ मिनिट ४० सेकंदात पार करायचे असते. सकाळच्या कडाक्याच्या थंडीत तरुणांनी अत्यंत जोमाने रनिंग केली. या सर्व कसोट्यांमध्ये निवडल्या गेलेल्या तरुणांचे १-२ दिवसानंतर मेडीकल चेकअप केले जाणार आहे. हा झाला पहिला दिवस. अशीच प्रक्रिया १७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. शारीरिक चाचण्यांमध्ये फिट्ट बसलेल्या तरुणांची यापुढे लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर अखिल भारतीय मेरिट लिस्ट तयार केली जाईल, त्यानुसारच त्यांचे सिलेक्शन केले जाणार आहे, अशी माहिती मेजर अश्विनी पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.