शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर कोरड्या उपाययोजनांची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 21:54 IST

जिल्ह्यातील ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या दोन हजार ४९ गावांमध्ये दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली केवळ कोरडी फुंकर मारली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपांची वीज न कापण्याचे आदेश, शेतसारा माफ अशा नेहमीच्याच उपाययोजनांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकर्जाचे पुनर्गठन : २०४९ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : जिल्ह्यातील ५० पैशापेक्षा कमी आणेवारी असलेल्या दोन हजार ४९ गावांमध्ये दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली केवळ कोरडी फुंकर मारली आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन, कृषीपंपांची वीज न कापण्याचे आदेश, शेतसारा माफ अशा नेहमीच्याच उपाययोजनांचा समावेश आहे.अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महसूल विभागाने घोषित केलेल्या अंतिम आणेवारीने जिल्ह्यातील दुष्काळावर शिक्कामोर्तब केले होते. २०१७-१८ या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पेक्षा कमी असलेल्या गावांची संख्या दोन हजार ४९ आहे. संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. जानेवारी महिन्यात अंतिम आणेवारी घोषित झाली असली तरी दुष्काळ घोषित करण्याचे निकष केंद्र शासनाने ठरविले होते. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनांमध्ये शासन स्तरावरून भरीव तरतुदी होतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु राज्य शासनाने घोषित केलेल्या दुष्काळग्रस्तांसाठीच्या उपाययोजना केवळ कोरडी फुंकर ठरत ंआहे.दुष्काळ घोषित झाल्याने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. प्रत्यक्षात या पुनर्गठन प्रक्रियेसाठी किती कालावधी लागतो, पेरणीच्या हंगामापूर्वी शेतकºयांच्या हातात कर्जाची रक्कम मिळणार काय, असे अनेक प्रश्न या दुष्काळी उपाययोजनेत अधांतरीच आहेत. निकषांच्या जोखडातून दुष्काळी उपाययोजना राबविल्या जात आहे. कृषीपंपाचा वीज पुरवठा तोडणार नाही याची घोषणा केली आहे. मात्र दुष्काळी उन्हाळ्यात सिंचन करणार कोण हे ही एक कोडेच आहे. नाममात्र असलेला शेतसारा माफ केल्याने कुठलाही लाभ शेतकऱ्याला मिळत नाही. परीक्षा शुल्काचेही तसेच आहे. ५०० ते हजार रुपयापर्यंत परीक्षा शुल्क माफ होईल. परंतु दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा आहे. केंद्र सरकारने निकष बदलवूनही त्याच उपाययोजना असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसत आहे.नियमित कर्जाची परतफेड करणारे जिल्हा बँकेचे ३५ हजार शेतकरी आहे. यातील २५ हजार शेतकºयांनी १७५ कोटींच्या कर्जाची परतफेड केली. यातील दहा हजार शेतकऱ्यांना १२५ कोटींच्या कर्जाची परतफेड करता आली नाही. अशा परतफेड न करू शकणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जपुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे. या संदर्भातील अध्यादेश निघाल्यानंतर सहकार विभाग अंमलबजावणी करणार आहे. परंतु तोपर्यंत पेरणीची वेळ निघून जाण्याची भीती आहे. दुष्काळी उपाययोजनेत टँकरने पाणीपुवठ्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना गत दोन महिन्यांपासून टँकरने पाणीपुरवठा होतच आहे. आता या उपाययोजनेचाही फारसा लाभ होणार नाही.दुष्काळी आठ सवलतींचा लाभजमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पाण्याचे टँकर पुरविणे आणि टंचाई असलेल्या गावात शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.