शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

भाजपात पसरली नीरव शांतता

By admin | Updated: June 26, 2014 00:02 IST

वणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा

विधानसभेबाबत अनुत्सुकता : दावेदारीचे पिल्लू सोडून स्थानिक नेते झाले मोकळेरवींद्र चांदेकर - वणीवणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा भाजपाला देण्याच्या मागणीचे पिल्लू सोडून या पक्षाचे स्थानिक नेते मोकळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले होते. युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या विजयासाठी हे पदाधिकारी, कार्यकर्ते घाम गाळताना दिसत होते. निवडणुकीत अहीर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी जल्लोषही केला होता. या जल्लोषानंतर आता भाजपात नीरव शांतता पसरली आहे. भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास विश्रांती घेत आहे. विधानसभा निवडणुकीत वणीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास आराम करीत आहे. विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहणार असल्याने वणीतून शिवसेनेचाच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शांत दिसून येत आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी या पक्षाने पक्ष पातळीवर वणीची जागा भाजपाला देण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. वणीची जागा मागून या पक्षाने केवळ एक पिल्लू सोडून दिले. खरा ‘डाव’ मात्र वेगळाच असल्याची चर्चा आहे. यावेळी युतीच्या उमेदवाराला पुन्हा चारी मुंड्या ‘चित’ करून पुढील सन २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपाच्या पदरात पाडून घेण्याचा ‘डाव’ आखला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सहभागी पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला फिरली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारामागे युतीत सहभागी असलेल्या पक्षांचे कोणते नेते किती जोमदारपणे सक्रिय होतील, हे बघणे आता मनोरंजक ठरणार आहे. कारण इतर पक्षांप्रमाणे भाजपातही गेल्या काही वर्षात गटबाजी उफाळली आहे. जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी, वेगवेगळ्या दिशांना तोंड करून असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत भाजपाचे काही पदाधिकारी, कार्यकर्तेही चांगलेच ‘सुदृढ’ झाले आहेत. त्यातून पक्षावर ताबा ठेवण्यासाठी प्रचंड चुरसही सुरु आहे.खासदार अहीर यांच्यासाठी मात्र स्थानिकचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटतात. अहीर यांनी या सर्वांना एकत्रित ठेवण्यात चांगलेच यश प्राप्त केले आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरल्या आहेत. अमुकाला तमुक क्षेत्र, तर तमुकाला अमुक क्षेत्र, अशी वाटणी करून त्यांनी पक्षात मेळ साधला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनाही या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवारासाठी काम करायला लावणे, चांगलेच जड जाण्याची शक्यता आहे. वणी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटणीला असल्याने भाजपात तूर्तास या निवडणुकीबाबत अनुत्सुकता दिसून येत आहे. परिणामी पक्षात आता शांतता आहे. विधानसभेत भाजपाचा उमेदवारच राहणार नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चिंत आहेत.