शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

भाजपात पसरली नीरव शांतता

By admin | Updated: June 26, 2014 00:02 IST

वणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा

विधानसभेबाबत अनुत्सुकता : दावेदारीचे पिल्लू सोडून स्थानिक नेते झाले मोकळेरवींद्र चांदेकर - वणीवणी विभानसभा क्षेत्रातील भाजपात लोकसभा निवडणुकीनंतर नीरव शांतता पसरली आहे. विधानसभा निवडणुकीबाबत या पक्षात अनुत्सुकता दिसून येत असून केवळ महायुतीत वणीची जागा भाजपाला देण्याच्या मागणीचे पिल्लू सोडून या पक्षाचे स्थानिक नेते मोकळे झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाले होते. युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या विजयासाठी हे पदाधिकारी, कार्यकर्ते घाम गाळताना दिसत होते. निवडणुकीत अहीर यांचा विजय झाल्यानंतर त्यांनी जल्लोषही केला होता. या जल्लोषानंतर आता भाजपात नीरव शांतता पसरली आहे. भाजपाचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास विश्रांती घेत आहे. विधानसभा निवडणुकीत वणीची जागा युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तूर्तास आराम करीत आहे. विधानसभा निवडणुकीतही युती कायम राहणार असल्याने वणीतून शिवसेनेचाच उमेदवार राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते शांत दिसून येत आहे. तथापि, काही दिवसांपूर्वी या पक्षाने पक्ष पातळीवर वणीची जागा भाजपाला देण्याची मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. वणीची जागा मागून या पक्षाने केवळ एक पिल्लू सोडून दिले. खरा ‘डाव’ मात्र वेगळाच असल्याची चर्चा आहे. यावेळी युतीच्या उमेदवाराला पुन्हा चारी मुंड्या ‘चित’ करून पुढील सन २0१९ च्या विधानसभा निवडणुकीत ही जागा भाजपाच्या पदरात पाडून घेण्याचा ‘डाव’ आखला जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत सहभागी पक्षांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला फिरली आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारामागे युतीत सहभागी असलेल्या पक्षांचे कोणते नेते किती जोमदारपणे सक्रिय होतील, हे बघणे आता मनोरंजक ठरणार आहे. कारण इतर पक्षांप्रमाणे भाजपातही गेल्या काही वर्षात गटबाजी उफाळली आहे. जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी आणि शहर पदाधिकारी, वेगवेगळ्या दिशांना तोंड करून असल्याचे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांत भाजपाचे काही पदाधिकारी, कार्यकर्तेही चांगलेच ‘सुदृढ’ झाले आहेत. त्यातून पक्षावर ताबा ठेवण्यासाठी प्रचंड चुरसही सुरु आहे.खासदार अहीर यांच्यासाठी मात्र स्थानिकचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटतात. अहीर यांनी या सर्वांना एकत्रित ठेवण्यात चांगलेच यश प्राप्त केले आहे. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्याही वापरल्या आहेत. अमुकाला तमुक क्षेत्र, तर तमुकाला अमुक क्षेत्र, अशी वाटणी करून त्यांनी पक्षात मेळ साधला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनाही या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना युतीच्या उमेदवारासाठी काम करायला लावणे, चांगलेच जड जाण्याची शक्यता आहे. वणी विधानसभेची जागा शिवसेनेच्या वाटणीला असल्याने भाजपात तूर्तास या निवडणुकीबाबत अनुत्सुकता दिसून येत आहे. परिणामी पक्षात आता शांतता आहे. विधानसभेत भाजपाचा उमेदवारच राहणार नसल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते निश्चिंत आहेत.