शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दारव्हा येथे भाजपाचा मेळावा

By admin | Updated: January 21, 2017 01:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे,

दारव्हा : पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोकाभिमुख निर्णय, जनविकासाच्या ध्यासामुळे, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला कार्यकर्त्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ते दारव्हा येथे शुक्रवारी आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले, प्रामाणिक माणूसच कठोर निर्णय घेऊ शकतो. त्यानुसार मोदी यांनी नोटबंदीचा कठोर निर्णय घेतल्याने देशात दडलेला काळा पैसा बाहेर आला. हा पैसा विकास कामांवर खर्च केला जाणार आहे. केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या. त्या जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. निवडणुकीसाठी आपले लक्ष स्पष्ट असून त्याला मेहनतीची जोड दिल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीत सत्ता असेल, असे त्यांनी सांगितले. पक्षाचा केवळ जाहिरनामा नसून तो वचननामा आहे. कार्यकर्त्यांनी जनतेशी नम्रपणे वागून गल्लीतील राजकारणाची गुंज आता दिल्लीत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चव्हाण यांनी कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला. मंचावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, माजी आमदार उत्तमराव इंगळे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय राहणे, माजी सभापती नीलेश भारती, नगरपरिषद उपाध्यक्ष प्रिती राहुल बलखंडे, डॉ. दिलीप जामनकर, धनंजय बलखंडे, सचिन जाधव, रवी अस्वार, मधुसूदन लोहकरे, नाना सावळे, नगरसेवक दामोदर लढ्ढा, शुभम गवई, सुनिता ठाकरे, मिरा कराळे, यादव पवार, पंजाब जाधव, सुभाष दायमा, गजानन गुल्हाने, घनश्याम वानखडे उपस्थित होते.( तालुकाप्रतिनिधी)