शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

कापूस उत्पादकांचे कोट्यवधींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

मागील आठवड्यात राळेगाव येथील चार कापूस व्यापाºयांनी आपापल्या जिनिंगमध्ये चार हजार ७०० ते चार हजार ८०० रुपये दराने चांगल्या प्रतीचा एफएक्यू कापूस खरेदी केला. फेअर, फरतड, झोडा मालाच्या प्रतवारीप्रमाणे त्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आला. राळेगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून व जिल्ह्यातूनही येथे कापूस विक्रीस आला.

ठळक मुद्देसीसीआयच्या खरेदीचा अभाव : शेतकऱ्यांना खासगीत कापूस विकण्याची वेळ

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : प्रथम २१ एप्रिल व त्यानंतर २७ एप्रिल रोजी सीसीआयची कापूस खरेदी सुरू होईल, अशी घोषणा संबंधितांद्वारे करण्यात आली होती. या दोनही तारखांना शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी सुरू झालेली नाही. ती आता कधी सुरू होईल हे सांगण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आपला कापूस खासगीत विकावा लागण्याची पाळी आली आहे. यात राळेगाव तालुक्यातील दोन हजार १०० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे.२१ ते २४ एप्रिल या काळात राळेगाव केंद्रावर एक हजार ४७७, खैरी केंद्रावर ६१२ याप्रमाणे दोन हजार ८९ शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री करण्याकरिता नोंदणी केलेली आहे. दीड महिन्यांपासून बंद असलेली कापूस खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत हे शेतकरी आहेत.मागील आठवड्यात राळेगाव येथील चार कापूस व्यापाºयांनी आपापल्या जिनिंगमध्ये चार हजार ७०० ते चार हजार ८०० रुपये दराने चांगल्या प्रतीचा एफएक्यू कापूस खरेदी केला. फेअर, फरतड, झोडा मालाच्या प्रतवारीप्रमाणे त्यापेक्षा कमी दरात खरेदी करण्यात आला. राळेगाव तालुक्यासह शेजारच्या तालुक्यातून व जिल्ह्यातूनही येथे कापूस विक्रीस आला.या आठवड्यात दररोज पाच हजार क्विंटलची आवक राहिली होती. आता या आठवड्यात परत खासगी खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. मजुरांची अडचण, गठाणीला मागणी नाही, नवे-जुने पेमेंट मिळण्यातील अडचणी आदी बाबींच्या समस्यांचा व्यापाºयांनाही सामना करावा लागत आहे.शेतकऱ्यांना यावेळी पैशांची नितांत गरज आहे. कडक उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. त्यामुळे आगीचा धोका आहे. त्यांचे अनेक व्यवहार थांबले आहे. समोर हंगाम आलेला आहे. त्वरित पैसे मिळण्याकरिता कापूस विक्री होणे आवश्यक आहे. शेतकºयांपुढे अनेक अडचणी असल्याने यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहे.शासन व प्रशासनाची कसोटीसीसीआयच्या कापूस खरेदीकरिता मंत्रालयातून आदेश निघाले. पालकमंत्री, जिल्हाधिकाºयांनी बैठक घेऊन निर्देश दिले. शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत ंसबंधितांकडून आदेश काढून घेतले. याचाही उपयोग न झाल्याने त्यांनी आत्मक्लेषचा मार्ग अवलंबिला. आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत शेतकऱ्यांची ही ज्वलंत समस्या मांडली तरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालेला नाही. संचारबंदी काळात इतर घटकांना मदतीचा हात मिळाला असताना, बळीराजाला सर्वच यंत्रणा अनुकूल असताना लाभ मिळालेला नाही. कोट्यवधींच्या नुकसानीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.जिनिंग प्रेसिंग संचालक सीसीआयद्वारे सुचविण्यात आलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची जिनिंग सीसीआयकरिता देण्यास तयार नाही. त्यामुळे खरेदी सुरू होऊ शकली नाही.- उमेश दाभेराव,खरेदी प्रतिनिधी, सीसीआय राळेगाव

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस