शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार योजनेपासून लाभार्थी अद्यापही वंचितच

By admin | Updated: September 1, 2016 02:35 IST

शासनाने ९ डिसेंबर २०१५ पासून अनुसूचित क्षेत्राअंतर्गत गावातील गरोदर व स्तनदा मातांचा प्रतिदिन एकवेळ चौरस आहार

मारेगाव : शासनाने ९ डिसेंबर २०१५ पासून अनुसूचित क्षेत्राअंतर्गत गावातील गरोदर व स्तनदा मातांचा प्रतिदिन एकवेळ चौरस आहार देण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम अमृत आहार योजना राज्यात सुरू केली. तालुक्यातील १०० टक्के कोलाम वस्ती असणारे श्रीरामपूर व इंदिराग्राम ही गावे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ नसल्याने सदर योजनेपासून वगळल्याने या गावातील गरजू महिला या योजनेच्या लाभापासून वंचित आहे.सदर योजना शासन निर्णयाप्रमाणे राबविली जात असून यवतमाळ जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ५२८ अनुसूचित गावांत सुरू करण्यात आली. मारेगाव एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाअंतर्गत तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ ४६ गावे व समाविष्ठ पोडातील ७२ अंगणवाडी व मिनीअंगणवाडी केंद्रातून सुरू आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी गरोदर व स्तनदा मातांना प्रतिदिन २६ रूपयांचे मर्यादित सोमवार ते शुक्रवारी चपाती भाकरी, भात, डाळ, हिरवी पालेभाजी, अंडी व (पर्यायी अन्नघटक) शेंगदाणा लाडू तसेच शनिवारी या चौरस आहारासोबत गुळासाखरेसह सोया दुध देण्याची योजना आहे. या योजनेतून कुंभा केंद्रातील श्रीरामपूर (समाविष्ठ-रामपूर, धरमपोड-बाबई) तसेच इंदिराग्राम (समाविष्ठ-नगार, गारगोटी, बंदर) ही १०० टक्के अनुजमात कोलामांची गावे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ नसल्याने वगळण्यात आल्याचे समजते. या दोन्ही गावांना १९९४ साली महसुली गावांचा दर्जा मिळाला आहे. अनुसूचित क्षेत्रातील गावांच्या यादीत अनु क्रमांक ७८ सेक्शन कोड ०१८६१४०० श्रीरामपूर एन.व्ही. तर अनुक्रमांक ७९ व सेक्शन कोड ०१८६३५०० क्रमांकावर इंदिरा ग्राम ही गावे अनुसूचित क्षेत्रात समाविष्ठ असल्याची नोंद आहे. मारेगाव एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी व यवतमाळ जिल्हा परिषद महिला व बालकल्याणच्या उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या गावातील लाभार्थ्यांनासुद्धा डॉ.अब्दूल कलाम अमृत आहार योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी आहे. सदर योजना अनुसूचित क्षेत्रातील गावात राबविली जात आहे. बहुतेक अंगणवाडी केंद्रात शासन निर्देशाप्रमाणे चार सदस्यीस आहार समिती ग्रामसभेतून नियुक्त केल्या गेली नसून योग्य नियंत्रण व देखरेखीअभावी चौरस आहाराचा बोगस आहार होऊ नये, यासाठी पर्यवेक्षकांनी सदर लाभ वाटप केंद्रावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)