शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

संभाव्य टोळधाड रोखण्यासाठी सतर्क रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचे आवाहन : वाळवंटी टोळधाडीपासून फळबागा वाचवा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गुजरात, राजस्थान व मध्यप्रदेशात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात या टोळधाडीचा प्रवेश झाला नसला तरी संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतक-यांना सतर्क राहून या टोळाधाडीचे नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.या टोळधाडीचे थवे ताशी १२ ते १६ कि.मी. इतक्या वेगाने उडतात. या टोळ किडीचे थवे दूरवर उडून जात असल्याने अशा टोळधाडीपासून धोका असतो. ही किड तिच्या मार्गातील वनस्पतीची हिरवी पाने, ुफुले, फळे, बिया, फांदी, पालवी आदींचा फडशा पाडतात. वाळवंटी टोळ ही नाकतोड्याच्या गटातील टोळ आपल्याकडे आढळतात. वाळवंटी टोळ ही तांबूस रंगाची असते. ही अत्यंत खादाड व नुकसान करणारी कीड आहे. एका टोळधाडीत असंख्य टोळ असतात. टोळामध्ये दोन प्रकारच्या स्थिती असतात. जेव्हा टोळांची संख्या खूपच कमी व विरळ असते तेव्हा त्या स्थितीत एकाकी स्थिती म्हणतात. अनुकूल हवामानात टोळांची संख्या खूप वाढते, त्याचे थवे तयार होतात व त्यांना भ्रमण करावेसे वाटते. हे थवे पुढे सरकत असतांना सायंकाळ झाल्यावर झाडा - झुडपामध्ये वस्तीत राहतात. पूर्ण वाढलेले थव्याचे स्थितीतील प्रौढ टोळ तांबूस रंगाचे असतात. एक चौरस किमी क्षेत्रावर जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळ जवळ ३ हजार क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा ६ ते ८ पटीने जास्त अन्न खातात. तांबूस टोळ पूर्णावस्थेत पोहचल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. टोळधाडीने अद्यापपर्यंत यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केलेला नाही मात्र शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. कृषी विभाग यासाठी सज्ज असून, शेतकऱ्यांनी दक्ष राहून टोळधाडी संदर्भात संबंधीत कृषी अधिकाºयांशी संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.असे करावे नियंत्रणअंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करून नियंत्रण करता येते. अंडी शोधून सामूहिकरित्या नष्ट करावीत. टोळांची सवय थव्या थव्याने एका दिशेने पळण्याची आहे. त्यामुळे पुढे येणाºया थव्याच्या वाटेवर ६० सेमी रुंद व ७५ सेंमी खोल चर खणून त्यात या पिल्लांना पकडता येते. संध्याकाळी, रात्रीच्या वेळी झाडाझुडपावर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटून तसेच टायर जाळून धूर केल्याने नियंत्रण होते. थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास निमतेल प्रति हेक्टरी २.५ लिटर फवारणी प्रभावी आहे. गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिफ्रोनील ५ एस. सी. व २.९२ ई.सी. व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळून रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजूबाजूस प्रति हेक्टरी २० ते ३० किलो या प्रमाणे फेकून द्यावे. जेणेकरून सदर आमिष खाल्यावर किडीचा मृत्यु होईल. मिथील परोथीआन २ टक्के भुक्टी २५-३०किलो प्रति हेक्टरी धुरळणी करावी. बेंडीओकार्ब ८२ डब्लू. पी, क्लोरोपायरीफोस २० ई.सी., डेल्टामेथ्रीन २.८ युएलव्ही या किटकनाशकांची टोळ नियंत्रणासाठी शिफारस केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली आहे. 

टॅग्स :agricultureशेती