शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बीडीआेंनी काढली एक कोटींची देयके

By admin | Updated: August 31, 2016 01:55 IST

महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरप्रकाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असली तरी आर्णी

सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील गैरप्रकाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असली तरी आर्णी पंचायत समितीने मात्र सर्व उच्चांक मोडीत काढले आहे. येथील गटविकास अधिकाऱ्याने आर्थिक अधिकाराची मर्यादा ओलांडून चक्क एक कोटींची रक्कम दोन महिन्यात खर्च केल्यानेप्रकरणाची व्याप्ती दिसते. आर्णी पंचायत समितीतील शेलू शेंदुरसनी आणि काठोडा येथील ग्रामपंचायतींना रोहयोतून रोपवाटिकेसाठी २०१२-१३ या आर्थिक वर्षाकरिता तांत्रिक मंजुरी देण्यात आली. ही मंजुरी देताना तत्कालीन बीडीओ आणि कृषी अधिकाऱ्याने शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. रोहयोअंतर्गत प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. यामध्ये पंचायत समितीस्तरावर २५ लाखाच्या मर्यादेतीलच कामांना तांत्रिक मंजुरी देण्याचा अधिकार आहे. पुढील रकमेची मंजुरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य शासनाने ३ आॅगस्ट २०११ रोजी स्वतंत्र आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानंतरही आर्णी येथील बीडीओने एकाच कुटुंबातील दोन व्यक्तीच्या नावाने तांत्रिक मंजुरी दिली. यात शेलू आणि काठोडा ही वेगवेगळी गावे दाखविण्यात आली. रोपवाटीकेसाठी या ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी २९ नोव्हेंबर २०१२ ला करारनामा केला. जागेचा करारनामा होण्यापूर्वीच बीडीओ आणि कृषी अधिकारी यांनी २ मे २०१५ रोजी काठोडा व शेलू शेंदुरसनी येथील रोपवाटीकेसाठी प्रत्येकी २६ लाख २० हजार रूपये मंजुरी केले. एकूण ६२ लाख ४० हजारांची देयके अदा केली. त्याच पाठोपाठ पुन्हा जून २०१२ रोजी पाच लाख वाढीव देण्यात आले. यावरून सदर कामात अनियमितता झाल्याचे दिसून येते. मंदा सुदाम खरगडे यांच्या शेत सर्व्हे नंबर ११७ तर काठोडा येथील मुलगा गजानन सुदाम खरगडे यांच्या शेत सर्व्हे नंबर २० मध्ये रोपवाटिका लावल्याचे दाखवून ही देयके काढण्यात आली आहेत. अधिकार नसताना गट विकास अधिकारी व कृषी अधिकारी यांनी आपल्याच स्तरावर तांत्रिक मंजुरी प्रदान केली आहे. यावर दोन्ही गावातील सरपंच आणि गट सचिवांच्यासुध्दा स्वाक्षऱ्या आहेत. २९ लाखांचा पांदण रस्ता ४आर्णी पंचायत समिती गट सचिवाने अधिकार नसताना उमरी पठार ते देवगाव डॅम पांदण रस्त्यासाठी २८ लाख ८० हजारांची तांत्रिक मंजुरी दिली आहे. येथील गट विकास अधिकाऱ्याने मंजुरीची आर्थिक मर्यादा ओलांडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अधिकारावरच अतिक्रमण केले आहे. आता या गट विकास अधिकाऱ्याबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.