शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

By admin | Updated: December 7, 2014 22:59 IST

आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून नव्या पद्धतीने केळीची लागवड केली. कृषी विभागाकडून शासकीय अनुदान मिळणार या आशेवर ही लागवड केली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा

गुंज : आधुनिकतेची कास धरत शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून नव्या पद्धतीने केळीची लागवड केली. कृषी विभागाकडून शासकीय अनुदान मिळणार या आशेवर ही लागवड केली. प्रत्यक्षात मात्र जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाने महागाव तालुक्याला शासकीय अनुदानाच्या लाभातून वगळले. त्यामुळे आता येथील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीत पारंपरिक पिकांमुळे मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, गहू या पिकांची शेती कायमचीच तोट्याची ठरत आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी टिशू कल्चर प्रक्रिया केलेली केळीची रोपे लावली. यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज व उधार रकमाही सावकारांसह शक्य तेथून घेतल्या. शासनाकडून आर्थिक अनुदान मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी आपले बागायती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक अडचण असतानाही घडामोड केली. भविष्यात फायदा मिळणारच या हेतुने जोखीम पत्करून साडेसतरा रुपये प्रतिरोप या दराने खरेदी केली. जवळपास २० हजार रुपये एकरी खर्च लागवडीसाठी शेतकऱ्यांना आला. दुष्काळी स्थितीतही शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग म्हणून बिकट आर्थिक स्थितीतही केळी लावण्याचा निर्णय घेतला. ऐरवी शेतकरी पारंपरिक शेतीची कास सोडण्यास तयार नाही, अशी ओरड कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी नवीन प्रयोग करण्याचे धाडस केले त्यांना कुठलीही मदत देण्यासाठी मात्र तगादा लावावा लागतो. अगोदरच आर्थिक अडचणीत आलेल्या या शेतकऱ्यांना हा नवीन प्रयोग चांगलाच भोवला आहे. ऐन वेळेवर शासनाने अनुदान देण्याचे टाळले. त्यामुळे आता शेती तर सोडाच उदरनिर्वाह कसा भागवायचा हा प्रश्न तालुक्यातील केळी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पडला आहे. या संकटातून लवकर सुटका करावी, अशी मागणी तालुक्यातील या शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)