शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

गणेशोत्सवातून कोविड लसीकरणाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:50 IST

मुकेश इंगोले दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची ...

मुकेश इंगोले

दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. परंतु या धामधुमीतही येथील एका गणेश मंडळाने नियमांचे पालन करण्यासोबतच कोविड लसीकरणाची जनजागृती करून सामाजिक बांधीलकी जोपासली आहे.

ओम गणेश मंडळाने स्थापना केलेले कोविड लसीवर विराजमान इवलेसे बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा या मंडळाने सुरू केली. सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

येथील अंबिकानगरातील हे मंडळ गणेशोत्सवात दरवर्षी काहीतरी वेगळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविते. यावर्षी कोविड लसीवर विराजमान गणपती बाप्पा कोरोनाबाबत जनजागृती करतानाचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. मूर्तिकार महेश दंडे यांनी केवळ नऊ इंच उंचीची सुबक गणेश मूर्ती साकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या आजारावर अद्याप औषध निघाले नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. लस घेण्यासाठी सर्वच स्तरावरून आवाहन केले जात आहे. तरीसुद्धा यासाठी आणखी जनजागृतीची गरज लक्षात घेता या मंडळाने तसा देखावा तयार केला. त्याचबरोबर सर्वात कमी उंचीची मूर्ती स्थापन व कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला जात आहे.

नायब तहसीलदार सुनील सरागे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर व नागरिकांसाठी लसीकरण शिबिर, दिव्यांग चित्रकार राजू राठोड याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. ॲड. नितीन जवके, ॲड. सचिन गोरले, सुनील आरेकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, महेश दंडे, निखिल मडसे, किशोर राऊत, ऋषिकेश गोटे, गौरव डोमाळे, अमोल राठोड आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

बाॅक्स

विविध उपक्रम राबविले

ओम गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळख निर्माण केली. यापूर्वी गणेशोत्सव तसेच मिरवणुकीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, वृक्षरोपण, स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाओ, बेटी पढाओ, वृद्धाश्रम आदी समस्येवर प्रकाश टाकला. त्यामुळे मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.