शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

गणेशोत्सवातून कोविड लसीकरणाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:50 IST

मुकेश इंगोले दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची ...

मुकेश इंगोले

दारव्हा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले. त्याउपरही सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. परंतु या धामधुमीतही येथील एका गणेश मंडळाने नियमांचे पालन करण्यासोबतच कोविड लसीकरणाची जनजागृती करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

ओम गणेश मंडळाने स्थापना केलेले कोविड लसीवर विराजमान इवलेसे बाप्पा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्याचबरोबर इतर अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. उत्सवाच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा या मंडळाने सुरू केली. सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

येथील अंबिकानगरातील हे मंडळ गणेशोत्सवात दरवर्षी काही तरी वेगळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबविते. या वर्षी कोविड लसीवर विराजमान गणपती बाप्पा कोरोनाबाबत जनजागृती करतानाचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. मूर्तिकार महेश दंडे यांनी केवळ नऊ इंच उंचीची सुबक गणेशमूर्ती साकारली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. या आजारावर अद्याप औषध निघाले नाही. त्यामुळे लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. लस घेण्यासाठी सर्वच स्तरांवरून आवाहन केले जात आहे. तरीसुद्धा यासाठी आणखी जनजागृतीची गरज लक्षात घेता या मंडळाने तसा देखावा तयार केला. त्याचबरोबर सर्वात कमी उंचीची मूर्ती स्थापन व कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा केला जात आहे.

नायब तहसीलदार सुनील सरागे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबिर व नागरिकांसाठी लसीकरण शिबिर, दिव्यांग चित्रकार राजू राठोड याचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाच्या सदस्यांनी नेत्रदानाचा संकल्प केला. ॲड. नितीन जवके, ॲड. सचिन गोरले, सुनील आरेकर यांच्या मार्गदर्शनात मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्निल राठोड, कोषाध्यक्ष प्रवीण राऊत, विलास शिले, महेश दंडे, निखिल मडसे, किशोर राऊत, ऋषिकेश गोटे, गौरव डोमाळे, अमोल राठोड आदींनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.

बाॅक्स

विविध उपक्रम राबविले

ओम गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळख निर्माण केली. यापूर्वी गणेशोत्सव तसेच मिरवणुकीच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या, वृक्षारोपण, स्त्री भ्रूणहत्या, बेटी बचाओ, बेटी पढाव, वृद्धाश्रम आदी समस्यांवर प्रकाश टाकला. त्यामुळे मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.