लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : तालुक्यात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केले असून पीक अक्षरश: वाळू लागले आहे. शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अचानक आलेल्या सोयाबीनवरील या रोगामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशागत केली. परंतु ऐन शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अज्ञात अळीचा प्रादूर्भाव झाला. पाने पिवळे पडू लागली. काही भागात तर पिकेच्या पिके सडू लागल्याचे चित्र दिसत आहे.पाटणबोरी, चालबर्डी, करंजी महसूल मंडळात येणाऱ्या अनेक गावांमध्ये सोयाबीनवर अज्ञात रोग आला आहे. सोयाबीन पेरणीसाठी रासायनिक खते व फवारणी आणि मशागतीसाठी कमीत कमी एकरी १५ हजार रूपये खर्च येतो. सोयाबीन पीक यावर्षी अतिशय चांगले असताना अज्ञात रोगाने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ऐन तोंडात आलेला घास हिरावून नेला जातो आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही.
सोयाबीनवर अज्ञात रोगाचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 05:00 IST
तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला. परंतु सदोष बियाणामुळे ३० टक्केच उगणव झाली. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पेरणीनंतर कशीबशी ७० टक्के पेरणी जमली. त्यावर पाऊसही समाधानकारक झाला. शेतकऱ्यांनी पिकाची चांगली मशागत केली. परंतु ऐन शेंगामध्ये दाणे भरण्याच्यावेळी अज्ञात अळीचा प्रादूर्भाव झाला. पाने पिवळे पडू लागली. काही भागात तर पिकेच्या पिके सडू लागल्याचे चित्र दिसत आहे.
सोयाबीनवर अज्ञात रोगाचे आक्रमण
ठळक मुद्देपांढरकवडा तालुका : शेतकरी सापडले अडचणीत, उत्पादनात घट होण्याची भीती