शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

यवतमाळातील वीज चोरीच्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 10:56 IST

वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.

ठळक मुद्देमहावितरण कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेटकर्मचाऱ्यांना होणारी मारहाण निंदनीय ग्राहकांकडून महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण निंदनीय असून अशा घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन खंडाईत यांनी आपण कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. आरोपींना तत्काळ अटक व्हावी आणि त्या

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वीज चोरी जादा असणाऱ्या भागात आता एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला. यामुळे वाढत्या वीज चोरी आणि हानीला लगाम घातला जाणार आहे.संपूर्ण राज्यातच वीज चोरी आणि हानीचे प्रमाण वाढत आहे. काही जिल्ह्यांमये तर वीज चोरी व हानीचे प्रमाण २५ टक्केपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे या चोरीला लागम घालण्याचे आव्हान महावितरणपुढे उभे टाकले आहे. त्यावर मात करण्यासाठी आता जादा वीज चोरी आणि हानी असलेल्या भागात एरियल बंच केबल टाकण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे वीज चोरी आणि हानीला आळा बसू शकेल, अशी महावितरणला अपेक्षा आहे. अमरावती परिमंडळातील भाजीबाजार, कडबिबाजार आदी परिसरात वीज चोरी व हानीचे प्रमाण जादा असल्याने तेथे एरीयल बंच केबल टाकण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले आहे.नागपूर परीक्षेत्राचे प्रादेशिक संचालक खंडाईत यांनी बुधवारी अमरावतीत बैठक घेतली. त्यात वारंवार आढावा घेऊनही परिमंडळातील काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वसुली आणि ग्राहकांच्या सेवेत पाहिजे तसा फरक पडत नसल्याचा ठपका त्यांनी ठेवला. ग्राहक सेवा व महावितरणच्या एकूणच कामासाठी कॅज्युअल अ‍ॅटीट्युड असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. चांगले काम करणाऱ्यांचा गौरव, तर कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांच्या कामाची नोंद गोपनीय अहवालात घेतली जाणार असल्याची तंबी त्यांनी दिली. महावितरण ही प्रथम सेवा, नंतर मोबदला घेणारी कंपनी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१८ हजार मेगावॅटची दररोज खरेदीमहावितरण दररोज १८ हजार मेगावॅट वीज खासगी व शासकीय स्त्रोतांकडून खरेदी करून ती ग्राहकांना पुरविते. महावितरणच्या उत्पनाचा ८७ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. त्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे पैसे वेळेत भरण्याची शिस्त लावणे गरजेचे असल्याचे भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.अमरावती परिमंडळात वीज हानीत सतत होणारी वाढ, चिंतेची बाब असून ग्राहकांना अचूक बिल मिळावे, तसेच दर्जेदार सेवा मिळावी यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाचे टार्गेट दिले.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण