शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

यवतमाळ नगरपरिषदेचे क्षेत्र आता ७० चौरस किलोमीटर

By admin | Updated: August 31, 2016 01:59 IST

यवतमाळ नगरपरिषदेची हद्द पूर्वी दहा चौरस किलोमीटर एवढी होती. परंतु लगतच्या आठ ग्रामपंचायतींचा

हद्दवाढ : लोकसंख्या अडीच लाख, हद्द सहा पटीने वाढली यवतमाळ : यवतमाळ नगरपरिषदेची हद्द पूर्वी दहा चौरस किलोमीटर एवढी होती. परंतु लगतच्या आठ ग्रामपंचायतींचा समावेश झाल्याने ही हद्द सहा पटीने वाढून तब्बल ७० चौरस किलोमीटरची झाली आहे. त्यामुळे तेथील विकासावर नजर ठेवताना नगरपरिषदेची कसोटी लागणार आहे. यवतमाळ नगर परिषदेचे कार्यक्षेत्र पूर्वी मर्यादित होते. नव्या बहुतांश वसाहती या ग्रामपंचायत क्षेत्रात मोडत होत्या. बसस्थानकापासून कोणत्याही दिशेने एक-दोन किलोमीटर पुढे गेले तरी नगर परिषदेची हद्द समाप्त होत होती. पूर्वी नगरपरिषदेचे चहुबाजूचे कार्यक्षेत्र केवळ १० किलोमीटरचे होते. नगरपरिषद क्षेत्राची लोकसंख्या पूर्वी केवळ एक लाख १६ हजार एवढी होती. परंतु हद्दवाढीनंतर नगरपरिषद सर्वच बाबतीत ‘प्लस’ झाली आहे. वडगाव, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, उमरसरा, भोसा, डोर्ली या ग्रामपंंचायती यवतमाळ नगरपरिषदेमध्ये समाविष्ठ झाल्या. त्यामुळे नगरपरिषदेची लोकसंख्या एक लाख १२ हजारांवरुन थेट अडीच लाखांवर पोहोचली. नगरपरिषदेचे कार्यक्षेत्र तर सहा पटीने वाढले. पूर्वी दहा किलोमीटर असलेले हे कार्यक्षेत्र आता ७० किलोमीटर एवढे झाले आहे. शहराच्या चहूबाजूने घाट ते घाट अशी नगरपरिषदेची नवी हद्द निश्चित करण्यात आली आहे. नगरपरिषदेची हद्दवाढ झाली असली तरी उत्पन्नाचे स्रोत मात्र वाढलेले नाही. (जिल्हा प्रतिनिधी) छत्रपतींचा पुतळा तीन महिन्यात उभा राहणार ४यवतमाळ शहरातील नाट्यगृह, तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा विषय आगामी तीन महिन्यात मार्गी लावला जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुभाष राय यांनी दिली. ते म्हणाले, बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा सौंदर्यीकरणाचा विषयही असाच निधी असूनही थंडबस्त्यात पडला होता. तो विषय आपण प्रयत्नपूर्वक मार्गी लावला. पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशानभूमीला आता महामार्गाकडून एकमेव प्रवेश द्वार राहणार आहे. तेथील इतर प्रवेशद्वार बंद केले जाणार आहे. तेथे सुरक्षा रक्षक व अन्य सोईसुविधा निर्माण केल्या जाणार असल्याचे सुभाष राय यांनी सांगितले. नगराध्यक्षांची प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम ४यवतमाळ नगरपरिषदेचे अध्यक्ष सुभाष राय यांनी शहरातील समस्या सोडविण्यासाठी प्रभागनिहाय मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर असताना त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील विविध मुद्यांवर चर्चा केली. ते म्हणाले, आपण शहरातील प्रत्येक प्रभागात रस्ते, नाल्या व अन्य समस्या निकाली काढण्यासाठी मोहीम राबवित आहो. सध्या तिसरा प्रभाग सुरू आहे. आपल्या सोबत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, मजूर, कामगार अशी सुमारे सव्वाशे जणांची फौज आहे. त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था आपण स्वत: करीत आहो. स्वत:ही दुपारचे जेवण त्यांच्या सोबतच घेत आहोत. आपण हद्दवाढीनंतर लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातही भेटी दिल्या. मात्र तेथे गेली कित्येक वर्ष विकास कामे मार्गी लागली नसल्याचे सुभाष राय यांनी सांगितले. रस्ते, नाल्या, पथदिवे, स्मशानभूमी या समस्या आजही कायम आहे. स्मशानभूमीतील लोखंड लंपास करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. नागरिकांची अनास्थाही त्यासाठी तेवढीच कारणीभूत ठरल्याचे सुभाष राय यांनी सांगितले.