शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:26 IST

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता ...

प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षांकरिता राज्यात राबविण्याबाबत शासनाने २९ जून २०२० च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम २०२१ राज्यात राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. सदर योजनेत शेतकरी सहभागाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी व मूग पिकांचा विमा काढता येईल. विमा काढण्यासाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अंतिम मुदत दि.१५ जुलै २०२१ ही आहे. शेतकऱ्यांनी अधिसुचित महसूल मंडळातील अधिसूचित पीकनिहाय कापूस दोन हजार रुपये प्रति हेक्‍टरी, सोयाबीन ८०० रुपये प्रति हेक्‍टरी, तूर ७०० रुपये प्रति हेक्‍टरी, ज्वारी ५००, उडीद ४००, मूग ४०० रुपये प्रति हेक्‍टरी, याप्रमाणे पीकविम्याचा शेतकऱ्यांनी हप्ता भरावयाचा आहे. यवतमाळ जिल्ह्याकरिता इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनीची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकाचा पीकविमा हप्ता अंतिम मुदतीच्या आतच भरावा व योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड यांनी केले आहे.