शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

जिल्हा निर्मितीसाठी अन्नत्याग सत्याग्रह

By admin | Updated: October 3, 2015 02:23 IST

पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे ...

पुसद विकास मंच : सत्याग्रह मंडपाला अनेकांची भेट पुसद : पुसद जिल्हा निर्मितीच्या आंदोलनाने आता जोर धरला असून कोणत्याही परिस्थितीत पुसद जिल्हा झालाच पाहिजे यासाठी पुसद विकास मंचने विडा उचलला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू करण्यात आले आहे. या सत्याग्रह मंडपाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत.येथील टिळकस्मारक मंदिराच्या प्रांगणात अन्नत्याग आंदोलन शुक्रवार २ आॅक्टोबरपासून सुरू झाले आहे. ८ आॅक्टोबरपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. गत दोन दशकांपासून पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न रखडला आहे. पुसद विकास मंचच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान, ठिय्या आंदोलन, संघर्ष रॅली आदी काढण्यात आली. हे आंदोलन अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने अ‍ॅड. सचिन नाईक, अभय गडम, साकीब शाह, अभिलेश खैरमोडे हे गांधी जयंतीपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसले आहे. पुसद परिसराच्या विकासासाठी पुसद जिल्हा होण्याशिवाय कोणताही उपाय नाही. त्यामुळे सर्व घटकांच्या दृष्टीने जिल्हा होणे महत्त्वाचे आहे, असे यावेळी सांगण्यात आले.सत्याग्रह मंडपाला माजी कुलगुरू डॉ.शेषराव सूर्यवंशी, डॉ. वजाहत मिर्झा, महेश खडसे, डॉ. ओमप्रकाश काकण, वसंतराव पाटील कान्हेकर, नायब तहसीलदार धबाले, नारायण पवार, उमाकांत चक्करवार, शिवाजी देशमुख, मनोहर बनसकर, प्रा. संध्या कदम, प्रा. महेंद्र पखाले, प्रा. सुधीर गोटे, वामनराव देशमुख, भारत वानखडे, नारायणराव क्षीरसागर, एजाज खान, स्वप्नील ढगे, अतुल नागरे, पंडित मानतुटे, सुधाकर चापके, नथ्थूराम राठोड आदींनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी निशांत बयास, धनंजय सोनी, नारायण पुलाते, पंकज पारधे, कैलास जगताप, मनोहर बनसकर, राहुल कांबळे, रवी ग्यानचंदाणी, किरण देशमुख, देवेंद्र खडसे, अ‍ॅड. चंद्रशेखर शिंदे, अ‍ॅड. कैलास राठोड, बाळासाहेब बरडे, श्रीकांत सरनाईक, अ‍ॅड. प्रशांत कागदेलवार, नाना बेले, संजय बजाज, अ‍ॅड. उमेश रेवणवार, डॉ. संजय भांगडे, संजय भंडारी यांच्यासह पुसद येथील अनेक नागरिक सहकार्य करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)आंदोलनाला सर्वपक्षीयांचा पाठिंबा पुसद जिल्हा निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पुसद येथील सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तसेच पुसदकर जनतेनेही या आंदोलनाच्या पाठीशी असल्याचे सांगितले. पुसद जिल्हा निर्मिती हा आता अस्मितेचा प्रश्न झाला असून पुसद जिल्हा झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे यावेळी सांगण्यात आले.