शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व पात्र शेतकºयांना कर्जमाफी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 23:28 IST

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी : निमणी-दाभाडी पोड येथे ‘सरकार आपल्या दारी’ उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत ६० लाखांवर शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरले आहेत. एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. अर्ज भरण्यासाठी सध्या १५ सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. तांत्रिक अडचणी असल्यास मुदत वाढविली जाणार आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.झरी तालुक्यातील निमणी-दाभाडी कोलाम पोड येथे जिल्हा परिषद सदस्य मीनाक्षी बोलेनवार यांनी आयोजित केलेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात ते मार्गदर्शन करत होते. २००९ ते २०१६ पर्यंत पीककर्ज थकीत असलेले व बँकांनी पुर्नगठित केलेले २०१७ च्या हंगामात एकही हप्ता न भरलेले शेतकरी पात्र असल्याची माहिती यावेळी तिवारी यांनी दिली. घरात वडील व १८ वर्षावरील सर्व वेगवेगळी सातबारा असणारी मुले स्वतंत्रपणे कर्जमाफीस पात्र असून दिवंगत शेतकºयांचे वारस यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उपविभागीय अधिकारी संदीप अपार, झरीचे तहसीलदार गणेश राऊत, गटविकास अधिकारी सुभाष चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गेडाम, वणी वनपरिक्षेत्र अधिकारी पटवारी, पाटणचे ठाणेदार वाघ, डॉ महेद्र लोढा, धर्मा आत्राम, सुरेश बोलेनवार, अंकित नैताम, विलास आत्राम, भीमराव नैताम आदी उपस्थित होते .यावेळी दाभाडी, वरपोड, खडकडोह, पवनार, घोन्सा, पेंढरी, सोनेगाव शिवपोड परिसरातील कोलाम पोडावरील आदिवासींनी जमिनीच्या मालकीचा प्रश्न, घरकूल योजनेच्या अडचणी, शेतकºयांच्या शेतमाल विक्रीसाठी येत असलेल्या अडचणी, नवीन पिककर्ज ,मुद्राकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी, अन्न, आरोग्य, गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण, शिक्षण, प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न उपस्थित केले. आदिवासी बहुल भागात सातबारावर वारसाची नावे चढविणे तसेच पिवळ्या शिधा वाटप नाहीत आदी प्रश्न रेंगाळत असल्याची तक्रार करण्यात आली. या सर्व समस्यांवर तत्काळ तोडगा काढा, असे आदेश शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी यांनी यावेळी दिले.