शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकरीची मौखिक परीक्षा बाद

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय

गुणांवर निवड : ग्रामविकास विभागाचा आदेश धडकलायवतमाळ : नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय नोकरीतून बाद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या परीक्षेच्या गुणांकनावरून त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.शासकीय नोकरीत एक जागा आणि हजारो अर्ज अशी स्थिती नेहमीच असते. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेतूनच लेखी परीक्षा आणि त्यानंतर मौखिक परीक्षा असे प्रकार पुढे आले. या दोनही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून शासकीय नोकरी दिली जायची. मात्र परीक्षेत अधिक गुण असलेले विद्यार्थीही तोंडी परीक्षेत कमी गुण घ्यायचे. त्यामुळे त्यांची निवड होत नव्हती. यामध्ये गैरप्रकारालाही मोठा वाव होता. परंतु आता केवळ लेखी परीक्षेच्या आधारावरच नोकरी मिळणार असल्याने गैरप्रकारालाही आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी, आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानुसार २०० गुणांची परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवाराची निवड करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पाठविले आहे. जिल्हा परिषदेची जम्बो भरती होत आहे. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. याच सुमारास गट क आणि गट ड पदाच्या भरतीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मौखिक परीक्षा रद्द झाल्याने गैरप्रकाराला तर आळा बसणारच आहे तसेच या परीक्षेचा तणावही नाहिसा झाला आहे. (शहर वार्ताहर)