शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

शासकीय नोकरीची मौखिक परीक्षा बाद

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय

गुणांवर निवड : ग्रामविकास विभागाचा आदेश धडकलायवतमाळ : नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय नोकरीतून बाद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या परीक्षेच्या गुणांकनावरून त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.शासकीय नोकरीत एक जागा आणि हजारो अर्ज अशी स्थिती नेहमीच असते. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेतूनच लेखी परीक्षा आणि त्यानंतर मौखिक परीक्षा असे प्रकार पुढे आले. या दोनही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून शासकीय नोकरी दिली जायची. मात्र परीक्षेत अधिक गुण असलेले विद्यार्थीही तोंडी परीक्षेत कमी गुण घ्यायचे. त्यामुळे त्यांची निवड होत नव्हती. यामध्ये गैरप्रकारालाही मोठा वाव होता. परंतु आता केवळ लेखी परीक्षेच्या आधारावरच नोकरी मिळणार असल्याने गैरप्रकारालाही आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी, आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानुसार २०० गुणांची परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवाराची निवड करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पाठविले आहे. जिल्हा परिषदेची जम्बो भरती होत आहे. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. याच सुमारास गट क आणि गट ड पदाच्या भरतीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मौखिक परीक्षा रद्द झाल्याने गैरप्रकाराला तर आळा बसणारच आहे तसेच या परीक्षेचा तणावही नाहिसा झाला आहे. (शहर वार्ताहर)