शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
3
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
4
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
5
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
6
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
7
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
8
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
9
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
10
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
11
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
12
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
13
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
14
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
15
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
16
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
17
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
18
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
19
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
20
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय

शासकीय नोकरीची मौखिक परीक्षा बाद

By admin | Updated: October 29, 2014 22:56 IST

नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय

गुणांवर निवड : ग्रामविकास विभागाचा आदेश धडकलायवतमाळ : नोकरीसाठी अर्ज भरण्यापासून ते तोंडी परीक्षेपर्यंत विद्यार्थ्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. त्यातही मौखिक परीक्षा म्हटली की, भल्याभल्ल्यांना घाम फुटतो. मात्र आता ही मौखिक परीक्षाच शासकीय नोकरीतून बाद करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने दिलेल्या परीक्षेच्या गुणांकनावरून त्याची सरळ नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.शासकीय नोकरीत एक जागा आणि हजारो अर्ज अशी स्थिती नेहमीच असते. त्यामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते. या स्पर्धेतूनच लेखी परीक्षा आणि त्यानंतर मौखिक परीक्षा असे प्रकार पुढे आले. या दोनही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आणि उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून शासकीय नोकरी दिली जायची. मात्र परीक्षेत अधिक गुण असलेले विद्यार्थीही तोंडी परीक्षेत कमी गुण घ्यायचे. त्यामुळे त्यांची निवड होत नव्हती. यामध्ये गैरप्रकारालाही मोठा वाव होता. परंतु आता केवळ लेखी परीक्षेच्या आधारावरच नोकरी मिळणार असल्याने गैरप्रकारालाही आळा बसणार आहे. लेखी परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धीक चाचणी, आवश्यकतेनुसार व्यावसायिक आणि तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानुसार २०० गुणांची परीक्षा घेण्याची सूचना देण्यात आली आहे. आता मौखिक परीक्षा न घेता गुणांवरच उमेदवाराची निवड करण्याचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पाठविले आहे. जिल्हा परिषदेची जम्बो भरती होत आहे. हजारो विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. याच सुमारास गट क आणि गट ड पदाच्या भरतीमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहे. मौखिक परीक्षा रद्द झाल्याने गैरप्रकाराला तर आळा बसणारच आहे तसेच या परीक्षेचा तणावही नाहिसा झाला आहे. (शहर वार्ताहर)