शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित

By admin | Updated: June 12, 2017 02:06 IST

पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते.

महावितरणविरूद्ध रोष : दिवसभरातून ४० ते ५० वेळा खंडित होतो वीज पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कवणी : पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. परंतु ग्रामीण भागात वीज असूनही नसल्यासारखीच आहे. विजेअभावी ग्रामीण जनतेचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माणसे फक्त शहरातच राहतात काय? खेड्यांमध्ये जनावरेच असतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण जनता विचारत आहे.वीज ही आता सजीवांना अन्न पाण्याएवढीच गरजेची बाब ठरली आहे. अन्नावाचून दोन दिवस सजीव काढू शकतील. परंतु दोन दिवस वीज नसेल, तर जीवांचे इतके हाल होतात की, सजीवांना जगणे त्रासदायक ठरते. अलिकडच्या काळात वीज एवढी दुर्बल का झाली, हे जनतेलाही समजायला मार्ग नाही. थोडीसी वाऱ्याची झुळूक आली तरी वीज खंडित होते. मग ती पुन्हा केव्हा सुरू होणार, याचा नेमही नसतो. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील खेडे मुलभूत सुविधांनी सशक्त करण्याचे कार्य सरकारला अजूनही जमले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. वीज निर्मीती करण्यासाठी लागणारी कच्ची सामग्री मुबलक प्रमाणात असूनही राज्यातील जनतेला विजेचे चटके सहन करावे लागत आहे, ही राज्याची शोकांतिका आहे. प्रत्येक सरकार आरूढ होताना तीन वर्षात राज्य विजेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होणार, सर्वांना २४ तास वीज मिळणार, असे आश्वासन देत आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याचे कोणत्याही शासनाला अजूनतरी जमले नाही. ग्रामीण जनता अजूनही विजेअभावी तडफडताना दिसून येते. तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यासाठी कायर, शिंदोला, पुनवट, लालगुडा येथे उपकेंद्र दिले आहेत. शिरपूर येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे, तेथे सहाय्यक अभियंता दर्जाचा अधिकारी नेमला आहे. तरीही ग्रामीण भागातील वीज सुरळीत चालू ठेवण्यात कंपनी अपयशी ठरत आहे. वीज सुरू असली तरी ती दिवसभर अविरतपणे सुरू आहे, असा दिवस खेड्यातील जनतेला पाहायला मिळतच नाही. दिवसभरातून ४० ते ५० वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. बहुतेक वेळा तर एकदा गेलेली वीज दोन-दोन दिवस सुरू होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील पिठगीरण्या बंद राहतात. लघु व्यावसायीकाचे व्यवसायाचे खोबरे होते. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश खेड्यात पाणी पुरवठा हा विंधन विहिरीवरून आहे. वीज नसल्याने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनतेचे प्रचंड हाल होतात. एक-दोन दिवस आंघोळ करणेसुद्धा टाळावे लागते. जनावरांना पाणी कोठून पाजावे, हा प्रश्न पडतो. शहरातील वीज पुरवठा खंडित होताच कंपनीचे कर्मचारी धावपळ करून तो तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न करतात. तर मग ग्रामीण भागासाठी हीच तत्परता का दाखविली जात नाही, असा ग्रामवासीयांचा सवाल आहे. विद्युत सहाय्यकाच्या नेमणुकीकडे दुर्लक्षग्रामीण भागातील विजेची देखभाल करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या शिफारशीने एक विद्युत सहाय्यक नेमण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही या नेमणुका केल्या नाही. बहुतांश गावांमध्ये वीज कर्मचारी नसल्याने एखादा खासगी युवक जीव धोक्यात घालून वीज सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील अभियंता व कर्मचारी शहरात राहून कारभार सांभाळत असल्याने ते वेळेवर जनतेच्या कामी पडत नसल्याच्या तक्रारी गावातून होतात, याकडेही वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.