शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

विजेअभावी ग्रामीण जनजीवन प्रभावित

By admin | Updated: June 12, 2017 02:06 IST

पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते.

महावितरणविरूद्ध रोष : दिवसभरातून ४० ते ५० वेळा खंडित होतो वीज पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कवणी : पावसाळा तोंडावर आला आणि विजेचा खेळखंडोबा होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले. वीज वितरण शहरी भागाकडे दक्षतापूर्वक लक्ष ठेवते. परंतु ग्रामीण भागात वीज असूनही नसल्यासारखीच आहे. विजेअभावी ग्रामीण जनतेचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माणसे फक्त शहरातच राहतात काय? खेड्यांमध्ये जनावरेच असतात काय? असा संतप्त सवाल ग्रामीण जनता विचारत आहे.वीज ही आता सजीवांना अन्न पाण्याएवढीच गरजेची बाब ठरली आहे. अन्नावाचून दोन दिवस सजीव काढू शकतील. परंतु दोन दिवस वीज नसेल, तर जीवांचे इतके हाल होतात की, सजीवांना जगणे त्रासदायक ठरते. अलिकडच्या काळात वीज एवढी दुर्बल का झाली, हे जनतेलाही समजायला मार्ग नाही. थोडीसी वाऱ्याची झुळूक आली तरी वीज खंडित होते. मग ती पुन्हा केव्हा सुरू होणार, याचा नेमही नसतो. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही देशातील खेडे मुलभूत सुविधांनी सशक्त करण्याचे कार्य सरकारला अजूनही जमले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. वीज निर्मीती करण्यासाठी लागणारी कच्ची सामग्री मुबलक प्रमाणात असूनही राज्यातील जनतेला विजेचे चटके सहन करावे लागत आहे, ही राज्याची शोकांतिका आहे. प्रत्येक सरकार आरूढ होताना तीन वर्षात राज्य विजेच्या बाबतीत स्वयंनिर्भर होणार, सर्वांना २४ तास वीज मिळणार, असे आश्वासन देत आहे. मात्र हे आश्वासन पाळण्याचे कोणत्याही शासनाला अजूनतरी जमले नाही. ग्रामीण जनता अजूनही विजेअभावी तडफडताना दिसून येते. तालुक्यात ग्रामीण भागात वीज पुरवठा करण्यासाठी कायर, शिंदोला, पुनवट, लालगुडा येथे उपकेंद्र दिले आहेत. शिरपूर येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे, तेथे सहाय्यक अभियंता दर्जाचा अधिकारी नेमला आहे. तरीही ग्रामीण भागातील वीज सुरळीत चालू ठेवण्यात कंपनी अपयशी ठरत आहे. वीज सुरू असली तरी ती दिवसभर अविरतपणे सुरू आहे, असा दिवस खेड्यातील जनतेला पाहायला मिळतच नाही. दिवसभरातून ४० ते ५० वेळा वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. बहुतेक वेळा तर एकदा गेलेली वीज दोन-दोन दिवस सुरू होत नाही. यामुळे ग्रामीण भागातील पिठगीरण्या बंद राहतात. लघु व्यावसायीकाचे व्यवसायाचे खोबरे होते. महत्त्वाचे म्हणजे बहुतांश खेड्यात पाणी पुरवठा हा विंधन विहिरीवरून आहे. वीज नसल्याने गावकऱ्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाण्यावाचून जनतेचे प्रचंड हाल होतात. एक-दोन दिवस आंघोळ करणेसुद्धा टाळावे लागते. जनावरांना पाणी कोठून पाजावे, हा प्रश्न पडतो. शहरातील वीज पुरवठा खंडित होताच कंपनीचे कर्मचारी धावपळ करून तो तत्काळ सुरू करण्याचे प्रयत्न करतात. तर मग ग्रामीण भागासाठी हीच तत्परता का दाखविली जात नाही, असा ग्रामवासीयांचा सवाल आहे. विद्युत सहाय्यकाच्या नेमणुकीकडे दुर्लक्षग्रामीण भागातील विजेची देखभाल करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामपंचायतीच्या शिफारशीने एक विद्युत सहाय्यक नेमण्याचे शासनाने जाहीर केले. मात्र वीज वितरण कंपनीने अजूनही या नेमणुका केल्या नाही. बहुतांश गावांमध्ये वीज कर्मचारी नसल्याने एखादा खासगी युवक जीव धोक्यात घालून वीज सुरू करण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण भागातील अभियंता व कर्मचारी शहरात राहून कारभार सांभाळत असल्याने ते वेळेवर जनतेच्या कामी पडत नसल्याच्या तक्रारी गावातून होतात, याकडेही वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे.