शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

५० गावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे.

पिण्याचे पाणी नाही : पैनगंगा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील विदर्भातील ५० व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. यावर्षी हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडली. त्यानंतर कसा तरी एप्रिल महिना निघाला. आता मे महिना तर नागरिकांना नकोसा झाला आहे. कारण पिण्याचेही पाणी गावांमध्ये उपलब्ध नाही. नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुराचा फटका व हिवाळा, उन्हाळ्यात पाणीटंचाई दरवर्षीच येथील नागरिकांच्या नशिबी आहे. गेल्या १५ वर्षापासून इसापूर धरणावर अवलंबून असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा डाव्या कालव्याचे काम रखडले आहे. हे काम अपूर्ण असल्याने आणि कालव्यात मोठेमोठे झाडे झुडपे वाढल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच पैनगंगा नदी आॅगस्ट महिन्यापासून कोरडी पडली असल्याने दोन्ही भागातील शेतकऱ्यांसह रहिवासी वस्तीसाठी असलेल्या नळयोजनासुद्धा पाण्याअभावी बंद पडल्या आहे. पैनगंगा नदीत आणि डाव्या कालव्यात आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडले गेले नाही. माणसांसह जनावरांनाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी रबीचा गहू, हरभरा, करडी व सूर्यफुलासारखे पीक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोरी, कोठा, चातारी, देवसरी, कोपरा, माणकेश्वर, वीरसनी, दिघी, घामापूर, सिंदगी, सावळेश्वर, भोजनगर, दिघडी, कारखेड, उंचवडद, साखरा, खरूस, चालगणी आदींसह विदर्भातील ५० गावांना व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये पाणीच नसल्यामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक वर्षांपासून इसापूर धरणाच्या ६५ किलोमीटर डाव्या कालव्याचे अर्ध्यावर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. पैनगंगा नदीत बारमाही पाणी उपलब्ध राहण्यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारे उभारावेत, कालव्यासाठी अधिग्रहीत केलेल्या चालू भावाप्रमाणे मोबदला द्यावा, ऊर्ध्व पैनगंगा कार्यालय विभाग क्र.५ हे उमरखेड येथे स्थलांतरीत करावे आणि विदर्भ-मराठवाड्याच्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा सिंचनाचा अनुशेष भरून काढावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांच्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या न्याय मागण्यांबाबत विचारच करण्यात आला नाही. प्रशासकीय अधिकारी व संबंधित मंत्र्यांना याबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यात रबी पिकांवरही पाणी सोडावे लागते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता अर्धवट कॅनॉलची कामे पूर्णत्वास नेवून पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारावे, अशी मागणी चक्रधर देवसरकर, अ‍ॅड.अनिल माने, कैलास वानखेडे, कैलास माने, तुकाराम माने, धनंजय माने, सुनील देवसरकर, राहुल माने, भगवान माने, बळवंत माने आदींसह ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. नियोजन आवश्यक पैनगंगेच्या काठावरील ५० हून अधिक गावांमध्ये दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु तरीदेखील योग्य नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना शेती तर सोडाच पिण्याच्याही पाण्यासाठी भटकावे लागते.