शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

५० गावांमध्ये ठणठणाट

By admin | Updated: May 27, 2017 00:18 IST

विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे.

पिण्याचे पाणी नाही : पैनगंगा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : विदर्भ-मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी पैनगंगा नदी यावर्षी हिवाळ्यातच पूर्णत: कोरडी पडली आहे. तसेच पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पाणीही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नदी काठावरील विदर्भातील ५० व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये सध्या पाण्याचा ठणठणाट आहे. यावर्षी हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी पडली. त्यानंतर कसा तरी एप्रिल महिना निघाला. आता मे महिना तर नागरिकांना नकोसा झाला आहे. कारण पिण्याचेही पाणी गावांमध्ये उपलब्ध नाही. नागरिकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पुराचा फटका व हिवाळा, उन्हाळ्यात पाणीटंचाई दरवर्षीच येथील नागरिकांच्या नशिबी आहे. गेल्या १५ वर्षापासून इसापूर धरणावर अवलंबून असलेल्या ऊर्ध्व पैनगंगा डाव्या कालव्याचे काम रखडले आहे. हे काम अपूर्ण असल्याने आणि कालव्यात मोठेमोठे झाडे झुडपे वाढल्याने शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही. तसेच पैनगंगा नदी आॅगस्ट महिन्यापासून कोरडी पडली असल्याने दोन्ही भागातील शेतकऱ्यांसह रहिवासी वस्तीसाठी असलेल्या नळयोजनासुद्धा पाण्याअभावी बंद पडल्या आहे. पैनगंगा नदीत आणि डाव्या कालव्यात आवश्यक त्या प्रमाणात पाणी सोडले गेले नाही. माणसांसह जनावरांनाही आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतकऱ्यांनी रबीचा गहू, हरभरा, करडी व सूर्यफुलासारखे पीक पाण्याअभावी वाऱ्यावर सोडले आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बोरी, कोठा, चातारी, देवसरी, कोपरा, माणकेश्वर, वीरसनी, दिघी, घामापूर, सिंदगी, सावळेश्वर, भोजनगर, दिघडी, कारखेड, उंचवडद, साखरा, खरूस, चालगणी आदींसह विदर्भातील ५० गावांना व मराठवाड्यातील ३५ गावांमध्ये पाणीच नसल्यामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक वर्षांपासून इसापूर धरणाच्या ६५ किलोमीटर डाव्या कालव्याचे अर्ध्यावर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. पैनगंगा नदीत बारमाही पाणी उपलब्ध राहण्यासाठी नदीपात्रात कोल्हापुरी बंधारे उभारावेत, कालव्यासाठी अधिग्रहीत केलेल्या चालू भावाप्रमाणे मोबदला द्यावा, ऊर्ध्व पैनगंगा कार्यालय विभाग क्र.५ हे उमरखेड येथे स्थलांतरीत करावे आणि विदर्भ-मराठवाड्याच्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचा सिंचनाचा अनुशेष भरून काढावा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांच्या आहेत. परंतु आजपर्यंत त्यांच्या न्याय मागण्यांबाबत विचारच करण्यात आला नाही. प्रशासकीय अधिकारी व संबंधित मंत्र्यांना याबाबत अनेकवेळा निवेदने देवूनही पैनगंगा नदी व ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. त्यामुळे हिवाळ्यात रबी पिकांवरही पाणी सोडावे लागते. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता अर्धवट कॅनॉलची कामे पूर्णत्वास नेवून पैनगंगा नदीवर ठिकठिकाणी बंधारे उभारावे, अशी मागणी चक्रधर देवसरकर, अ‍ॅड.अनिल माने, कैलास वानखेडे, कैलास माने, तुकाराम माने, धनंजय माने, सुनील देवसरकर, राहुल माने, भगवान माने, बळवंत माने आदींसह ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. नियोजन आवश्यक पैनगंगेच्या काठावरील ५० हून अधिक गावांमध्ये दरवर्षीच तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. परंतु तरीदेखील योग्य नियोजन करण्यात येत नाही. त्यामुळे नागरिकांना शेती तर सोडाच पिण्याच्याही पाण्यासाठी भटकावे लागते.