शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:14 IST

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले.

ठळक मुद्देअधिकारीच नाही : अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांची मनमानी, वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले. कुणी अधिकारीच नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असून अप-डाऊन करणाºयांमुळे कोणतेच काम वेळेत होताना दिसत नाही.जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे येथे नवीन आकृतिबंध तयार करून आरटीओ कार्यालयात नवीन पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. कित्येक वर्षांपासून येथील पदांची पुनर्रचनाच झाली नसल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याची ओरड सुरू आहे. सध्या मंजूर पदांपैकीच कित्येक पदे रिक्त आहे. त्यामुळे सर्वांचच ‘चांगभलं’ सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथे पूर्णवेळ अधिकारीच मिळालेला नाही. त्यामुळे येथील दैनंदिन कामकाज प्रभावीत झाले आहे.अमरावतीवरून यवतमाळचा प्रशासकीय कारभार हाकणाºया प्रभारी अधिकाºयांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्याचा लाभ येथील यंत्रणा घेत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना तर सोडाच येथे ‘एजन्ट’ म्हणून राबणाºयांनाही बसत आहे. आरटीओतील कोणतेच काम अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय होत नाही, अशी अनेक वाहनधारकांची ओरड आहे. सरळ मार्गाने एखादी सुशिक्षीत व्यक्ती कोणत्याही कामाचा अर्ज घेऊन गेली, तर त्याला कुणीच उभ करीत नाही. मात्र त्याच व्यक्तीने आरटीओ परिसरात ठाण मांडून असलेल्या एजन्टांची मदत घेतल्यास त्याचे कोणतेच काम अडत नाही, हे विशेष.कोणत्याही नियमांची आठकाठी येथे येत नाही. सामान्य व्यक्तीला फिटनेससाठी एमबीबीएस डॉक्टरचेच प्रमाणपत्र लागते. मात्र आरटीओच्या ठरलेल्या यंत्रणेकडून गेल्यास अशा प्रमाणपत्राचीही खातरजमा केली जात नाही. केवळ ५० रूपयांत एमबीबीएस डॉक्टरच्या नावे शिक्का मारून प्रमाणपत्र दिले जात असल्याची चर्चा आहे. तेसुद्धा तत्काळ.असे एक ना अनेक किस्से येथे सुरू आहे. लिपीकवर्गीय यंत्रणाच कार्यालयीन कामकाज सांभाळत असल्याने कोणी किती ‘गल्ला’ जमवायचा, हा त्याच्या क्षमतेचा विषय झाल्याची माहिती आहे. कार्यालयात येण्या-जाण्याचे कर्मचाºयांवर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे कर्मचारी सैरभैर झाले आहेत. वाहनधारकांना मात्र विविध कामांसाठी कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागत आहे.आठवडाभर वाहनांचे पासिंग ठप्पगेल्या २८ आॅगस्टपासून तब्बल आठवडाभर काही कारण नसताना वाहनांचे पासिंग बंद होते. बहुतांश कर्मचारी अमरावतीवरून अप-डाऊन करीत असल्याने प्रत्येक कर्मचारी उशीरा येऊन लवकर घरी परतण्याच्या घाईत असतो. दुपारी १२ वाजताच्या असापास पोहोचलेल्या कर्मचाºयांचा अर्ध्या तासाने लंच टाईम होतो. नंतर तासभर काम चालते न चालते तोच त्यांनी घरी जाण्याचे वेध लागतात.