शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

आरटीओचा प्रशासकीय कारभार ढेपाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 23:14 IST

स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले.

ठळक मुद्देअधिकारीच नाही : अप-डाऊन करणाºया कर्मचाºयांची मनमानी, वाहनधारक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्थानिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कार्यालयाचे कामकाज पूर्णत: ढेपाळले. कुणी अधिकारीच नसल्याने कर्मचाºयांची मनमानी सुरू असून अप-डाऊन करणाºयांमुळे कोणतेच काम वेळेत होताना दिसत नाही.जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. त्यामुळे येथे नवीन आकृतिबंध तयार करून आरटीओ कार्यालयात नवीन पदनिर्मिती करणे आवश्यक आहे. कित्येक वर्षांपासून येथील पदांची पुनर्रचनाच झाली नसल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याची ओरड सुरू आहे. सध्या मंजूर पदांपैकीच कित्येक पदे रिक्त आहे. त्यामुळे सर्वांचच ‘चांगभलं’ सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद देशमुख यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथे पूर्णवेळ अधिकारीच मिळालेला नाही. त्यामुळे येथील दैनंदिन कामकाज प्रभावीत झाले आहे.अमरावतीवरून यवतमाळचा प्रशासकीय कारभार हाकणाºया प्रभारी अधिकाºयांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्याचा लाभ येथील यंत्रणा घेत असून त्याचा फटका सामान्य नागरिकांना तर सोडाच येथे ‘एजन्ट’ म्हणून राबणाºयांनाही बसत आहे. आरटीओतील कोणतेच काम अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय होत नाही, अशी अनेक वाहनधारकांची ओरड आहे. सरळ मार्गाने एखादी सुशिक्षीत व्यक्ती कोणत्याही कामाचा अर्ज घेऊन गेली, तर त्याला कुणीच उभ करीत नाही. मात्र त्याच व्यक्तीने आरटीओ परिसरात ठाण मांडून असलेल्या एजन्टांची मदत घेतल्यास त्याचे कोणतेच काम अडत नाही, हे विशेष.कोणत्याही नियमांची आठकाठी येथे येत नाही. सामान्य व्यक्तीला फिटनेससाठी एमबीबीएस डॉक्टरचेच प्रमाणपत्र लागते. मात्र आरटीओच्या ठरलेल्या यंत्रणेकडून गेल्यास अशा प्रमाणपत्राचीही खातरजमा केली जात नाही. केवळ ५० रूपयांत एमबीबीएस डॉक्टरच्या नावे शिक्का मारून प्रमाणपत्र दिले जात असल्याची चर्चा आहे. तेसुद्धा तत्काळ.असे एक ना अनेक किस्से येथे सुरू आहे. लिपीकवर्गीय यंत्रणाच कार्यालयीन कामकाज सांभाळत असल्याने कोणी किती ‘गल्ला’ जमवायचा, हा त्याच्या क्षमतेचा विषय झाल्याची माहिती आहे. कार्यालयात येण्या-जाण्याचे कर्मचाºयांवर कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे कर्मचारी सैरभैर झाले आहेत. वाहनधारकांना मात्र विविध कामांसाठी कार्यालयाच्या येरझारा माराव्या लागत आहे.आठवडाभर वाहनांचे पासिंग ठप्पगेल्या २८ आॅगस्टपासून तब्बल आठवडाभर काही कारण नसताना वाहनांचे पासिंग बंद होते. बहुतांश कर्मचारी अमरावतीवरून अप-डाऊन करीत असल्याने प्रत्येक कर्मचारी उशीरा येऊन लवकर घरी परतण्याच्या घाईत असतो. दुपारी १२ वाजताच्या असापास पोहोचलेल्या कर्मचाºयांचा अर्ध्या तासाने लंच टाईम होतो. नंतर तासभर काम चालते न चालते तोच त्यांनी घरी जाण्याचे वेध लागतात.