शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
3
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
4
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
5
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
6
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
7
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
8
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
9
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
10
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
11
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
12
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
13
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
15
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
16
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
17
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
18
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
19
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
20
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?

जनावर तस्करी रोखण्यास प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुक्यातून राजरोसपणे तस्करी : वाहन पास करून देण्यासाठी दलाल झाले सक्रीय, चौकशी करण्याची होतेयं मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली. ही घटना घडत नाही, तोच पुन्हा १७ ऑक्टोबरला याच चेकपोस्टवर गुरे भरून जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पकडून ३५ बैलांची सुटका केली. एकूण ३८ बैल असलेल्या या कंटेनरमध्ये तीन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पाच-सहा दिवसाआड या घटना घडत आहे. जनावरांची वाहने तेलंगणातही पास करून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. परंतु जनावरांची तस्करी सुरूच आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण मदत करतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जनावरांची वाहने पास करून देणाऱ्या दलालांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून या दलालांना बेड्या ठोकणे आवश्यक आहे. मुख्य सुत्रधार अद्यापही मोकळेच असल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन महिन्यात हैद्राबाद येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेणारे जवळपास नऊ ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर पकडले होते. ट्रकचालक व संबंधितांना अटक केल्या जाते. जनावरांची सुटका केली जाते. परंतु जनावरांची तस्करी बंद का होत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे.पांढरकवडा तालुक्यातील पशुधन आले संकटातजनावरांची तस्करीला आळा न बसता, जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. प्रशासन मात्र मुग गीळून गप्प बसले आहे. या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही ट्रकद्वारे कत्तलीसाठी नेली जात आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी