शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जनावर तस्करी रोखण्यास प्रशासन अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली.

ठळक मुद्देपांढरकवडा तालुक्यातून राजरोसपणे तस्करी : वाहन पास करून देण्यासाठी दलाल झाले सक्रीय, चौकशी करण्याची होतेयं मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : येथून जाणाऱ्या नागपूर-हैद्राबाद या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी सुरूच असून मोठ्या प्रमाणावर होणारी ही तस्करी रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.महाराष्ट्र राज्यात गोहत्या व गोवंश हत्याबंदी लागू झाल्यानंतरही हैद्राबादच्या कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणावर नियमीतपणे जनावरे नेल्या जात आहे. मागील महिन्यापासून या तस्करीत वाढ झाली आहे. गेल्या ११ ऑक्टोबर रोजी पिंपळखुटी चेकपोस्टवरील बॅरेकेटींग तोडून तेलंगणात पळून जाणाऱ्या गुरे भरून असलेल्या कंटेनरला पोलिसांनी अडवून ४० जनावरांची सुटका केली. ही घटना घडत नाही, तोच पुन्हा १७ ऑक्टोबरला याच चेकपोस्टवर गुरे भरून जाणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पकडून ३५ बैलांची सुटका केली. एकूण ३८ बैल असलेल्या या कंटेनरमध्ये तीन बैलांचा गुदमरून मृत्यू झाला होता. पाच-सहा दिवसाआड या घटना घडत आहे. जनावरांची वाहने तेलंगणातही पास करून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. परंतु जनावरांची तस्करी सुरूच आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तेलंगणामध्ये जनावरांची वाहने पास करून देण्याकरिता कोण मदत करतात, याचा शोध घेणे आवश्यक आहे. जनावरांची वाहने पास करून देणाऱ्या दलालांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलल्या जात आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करून या दलालांना बेड्या ठोकणे आवश्यक आहे. मुख्य सुत्रधार अद्यापही मोकळेच असल्याचे बोलल्या जात आहे. मागील तीन महिन्यात हैद्राबाद येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेणारे जवळपास नऊ ट्रक पांढरकवडा पोलिसांनी पिपंळखुटी चेकपोस्टवर पकडले होते. ट्रकचालक व संबंधितांना अटक केल्या जाते. जनावरांची सुटका केली जाते. परंतु जनावरांची तस्करी बंद का होत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे.पांढरकवडा तालुक्यातील पशुधन आले संकटातजनावरांची तस्करीला आळा न बसता, जनावरांची तस्करी सतत सुरूच आहे. प्रशासन मात्र मुग गीळून गप्प बसले आहे. या प्रकाराकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप विविध संघटनांनी केला आहे. गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही ट्रकद्वारे कत्तलीसाठी नेली जात आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी