शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

आदिवासी विद्यार्थिनींचे उपोषण

By admin | Updated: July 29, 2016 02:20 IST

शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले.

विविध मागण्या : वसतिगृहासमोरच दिला ठिय्या यवतमाळ : शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच या विद्यार्थिनींनी ठिय्या दिला आहे. मुलींच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि गृहपाल व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी करीत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. जेवण नेहमीच अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने भोजनात सुधारणा करावी, तसेच भोजन कंत्राटदार बदलविण्याची मागणी यांनी लावून धरली आहे. याशिवाय गृहपाल आणि कर्मचाऱ्यांची बदली करावी, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, निवासी गृहपालाची नियुक्ती करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. वसतिगृहातील कर्मचारी शिवीगाळ करतात, असा त्यांचा आरोप आहे. समस्या घेऊन गृहपालांकडे गेल्यास वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जाते, निकृष्ट जेवणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो, दहा बाय दहाच्या खोलीत १३ ते १४ मुलींना राहावे लागते, दवाखान्यात नेताना पैसे घेतले जातात, कर्मचारी सोबत येत नाही, वसतिगृह स्वच्छ राहात नाही, कर्मचारी स्वत:ची कामे मुलींना सांगतात, भत्ता व्यवस्थित दिला जात नाही, आदी आरोपही विद्यार्थिनींनी केले आहे. या उपोषणाची दखल घेत गुरूवारी पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी के.बी.पंधरे आणि डी.जे.उरकुडे यवतमाळात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेत तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या समस्या निर्धारित वेळेत सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र विद्यार्थिनींनी मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, असा हेका धरला. त्यामुळे वृत्तलिहिस्तोवर उपोषण सुरू होते. दरम्यान, वसतिगृहाच्या गृहपाल सध्या प्रशिक्षणासाठी बाहेर गावी गेल्या आहेत. प्रभारी गृहपाल म्हणून टी.एम.अगलधरे काम पाहात आहे. त्यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थिनींना जेवण करून घेण्याची विनंती केली. तसेच प्रवेशव्दारासमोर उपोषण न करता वसतिगृहाच्या प्रांगणात बसण्याचीही विनंती केली. मात्र उपोषणकर्त्या विद्याीर्थिनींनी त्यांची विनंती फेटाळून लावत प्रवेशव्दारासमोरच उपोषण सुरू ठेवले आहे. या दरम्यान तीन ते चार मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)