शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अबब ! जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेत १६ अपंग शिक्षक

By admin | Updated: May 15, 2017 00:54 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली

समायोजनात तक्रारी : यवतमाळ पंचायतची प्रक्रिया उद्या लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया रविवारी राबविण्यात आली. इतर पंचायत समित्यांमधील समायोजन पार पडले, तरी यवतमाळ पंचायत समितीमध्ये मात्र ‘बोगस अपंगत्वा’च्या तक्रारींनी घोळ घातला. एकाच शाळेत तब्बल १६ शिक्षक अपंग असल्याचा अजब प्रकार उघड झाल्याने येथील समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी राबविण्यात येणार आहे. सकाळी १० वाजतापासून घाटंजी, बाभूळगाव, कळंब, आर्णी, नेर, झरी, पांढरकवडा आणि मारेगाव या पंचायत समितीमधील शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली. तर दुपारी २ वाजतापासून पुसद, उमरखेड, महागाव, वणी, दारव्हा, दिग्रस, राळेगाव, यवतमाळ पंचायत समित्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला आणि शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर यांची उपस्थिती होती. यात प्रामुख्याने दुर्गम भागातील आणि द्विशिक्षकी शाळांना शिक्षक देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, प्रत्येक पंचायत समितीमध्ये १५ ते २० शिक्षक अतिरिक्त असताना रिक्त जागांची संख्या मात्र दुप्पट होती. बाभूळगाव पंचायत समितीत १२ शिक्षकांचे समायोजन झाले, मात्र रिक्त जागा २९ होत्या. त्यामुळे समायोजनानंतरही अनेक जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले. समायोजनात अपंग, परितक्त्या, वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात आले. नेमका हाच धागा धरून यवतमाळ पंचायत समितीमधील काही शिक्षकांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली. यातील अनेक प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या तक्रारी खुद्द शिक्षकांनीच केल्या. लोहारा येथील शाळेत १९ शिक्षक पदे असताना तेथील तब्बल १६ जणांनी अपंगत्वाची प्रमाणपत्रे सादर केली. उर्वरित ३ ूमहिला आहेत. त्यामुळे यवतमाळ पंचायत समितीची समायोजन प्रक्रिया स्थगित करून ती मंगळवारी १६ मे रोजी सीईओंच्या उपस्थितीत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यादी बदलावी लागली समायोजनाची प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित पंचायत समितीमधील रिक्त पदांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे जिल्हास्तरावरून रवाना करण्यात आली. मात्र, बहुतांश पंचायत समित्यांनी ही यादी वेळेत जाहीर केलीच नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांना थेट समायोजनाची प्रक्रिया सुरू झाल्यावरच रिक्त जागांचे पर्याय पाहता आले. संचमान्यतेनुसार काही शाळांमध्ये अधिक पटसंख्या असूनही कमी शिक्षकांची पदे मंजूर दाखविण्यात आली. यावर वारंवार शिक्षकांनी आक्षेप घेतल्यामुळे रिक्त पदांची यादी दिवसभरात ३ ते ४ वेळा प्रशासनाला बदलावी लागली.