शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अवघा २0 टक्के जलसाठा

By admin | Updated: August 12, 2014 21:06 IST

पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने,

अकोला : पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने, या भागातील जलसाठय़ांची स्थिती गंभीर झाली आहे. हीच परिस्थिती राहीली तर, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती वगळता इतर चार जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने या विभागातील मोठय़ा, मध्यम, लघू प्रकल्पांची पातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता, तो आता १८.३४ दलघमीपर्यंंत घसरला आहे. या धरणातील जलसाठी २२ टक्क्यांहून घसरून २१ टक्क्यांवर आला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ३५ टक्के, निगरुणा २४ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहर पूरसंरक्षक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात गत आठवड्यात २२.७७ दलघमी जलसाठा होता. तो घसरू न २0.५३ दलघमी झाला आहे. ज्ञानगंगा प्रकल्पात ३९ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, या जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात ४६ टक्के, गोकी ३५ टक्के, वाघाडी ३५ टक्के, तर बोरगाव मध्यम प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा उरला आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाचीही गंभीर अवस्था आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्यावर पोहोचली असून, उमा प्रकल्पात १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील वाण धरणात मात्र ७८ टक्के आणि पोपटखेड धरणात ८३ टक्के, तर यवतामाळ जिल्हय़ातील लोअरपूस या प्रकल्पामध्ये ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.