शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

पश्‍चिम विदर्भातील धरणांमध्ये अवघा २0 टक्के जलसाठा

By admin | Updated: August 12, 2014 21:06 IST

पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने,

अकोला : पावसाळा संपत आला तरी, पश्‍चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्हय़ांमध्ये पुरेसा पाऊस झाला नसल्याने, या भागातील जलसाठय़ांची स्थिती गंभीर झाली आहे. हीच परिस्थिती राहीली तर, पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्‍चिम विदर्भातील अमरावती वगळता इतर चार जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने या विभागातील मोठय़ा, मध्यम, लघू प्रकल्पांची पातळी घसरत चालली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणार्‍या काटेपूर्णा सिंचन प्रकल्पात आजमितीस १८.८५ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता, तो आता १८.३४ दलघमीपर्यंंत घसरला आहे. या धरणातील जलसाठी २२ टक्क्यांहून घसरून २१ टक्क्यांवर आला आहे. याच जिल्हय़ातील मोर्णा मध्यम प्रकल्पात ३५ टक्के, निगरुणा २४ टक्के, तर उमा या मध्यम प्रकल्पात केवळ १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहर पूरसंरक्षक योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्य टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा या प्रकल्पात गत आठवड्यात २२.७७ दलघमी जलसाठा होता. तो घसरू न २0.५३ दलघमी झाला आहे. ज्ञानगंगा प्रकल्पात ३९ टक्के, मस २६ टक्के, कोराडी ४५ टक्के, तर पलढग या प्रकल्पात २0 टक्के जलसाठा उरला आहे. यवतमाळ जिल्हय़ातील पूस या मोठय़ा प्रकल्पात १८ टक्के जलसाठा शिल्लक असून, या जिल्ह्यातील सायखेडा प्रकल्पात ४६ टक्के, गोकी ३५ टक्के, वाघाडी ३५ टक्के, तर बोरगाव मध्यम प्रकल्पात ६५ टक्के जलसाठा उरला आहे. वाशिम जिल्हय़ातील सोनल व एकबुर्जी प्रकल्पाचीही गंभीर अवस्था आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा प्रकल्पाची पातळी शून्यावर पोहोचली असून, उमा प्रकल्पात १0 टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील वाण धरणात मात्र ७८ टक्के आणि पोपटखेड धरणात ८३ टक्के, तर यवतामाळ जिल्हय़ातील लोअरपूस या प्रकल्पामध्ये ५0 टक्के जलसाठा शिल्लक आहे.