शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

आसूड यात्रा यवतमाळात

By admin | Updated: April 13, 2017 00:49 IST

सध्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारित आहे. ही लूट अशीच पाहात राहाल,

लुटीवर आधारित व्यवस्था : शेतकऱ्यांना एकजुटीचे आवाहन यवतमाळ : सध्याची संपूर्ण अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीवर आधारित आहे. ही लूट अशीच पाहात राहाल, तर वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. याविरूद्ध शेतकऱ्यांनी पेटून उठावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले. ‘सीएम टू पीम’ या शेतकरी आसूड यात्रेला नागपुरातून सुरूवात झाली. ही यात्रा बुधवारी यवतमाळात धडकली. त्यावेळी आमदार बच्चू कडू मेडिकल कॉलेज चौकातील बचत भवनात आयोजित जनता दरबारात बोलत होते. ही यात्रा २१ एप्रिलला गुजरातमधील वडनगरला पोहचणार असल्याचे सांगून ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हातात विविध पक्षांचा झेंडा थोपविला जातो. हा झेंडा हातात घेतला की शेतकरी आपल्या समस्या विसरून जातात. खरे तर एकसारख्या शेतकरी आत्महत्यांनी राज्य हादरले आहे. तरीही सरकार काहीच करायला तयार नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यातील १६ लाख कर्मचाऱ्यांपुढे हे सरकार गरागर वाकते. मात्र आठ कोटी शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार साधा विचारही करीत नाही. त्यामुळे आता सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज त्यांनी प्रतिपादीत केली. देशाचे पंतप्रधान खोटारडे असल्याचा आरोप करून ते म्हणाले, ते केवळ मोठमोठ्या घोषणा करण्याच धन्यता मानतात. शेतकऱ्यांना थापा मारतात. नोटाबंदीत भाजपाचाच सर्वाधिक लाभ झाल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे ताळेबंद बदलत असेल, तर एक लाख कोटी खर्च करून बुलेट ट्रेन आणण्याची काय आवश्यकता आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांसाठी सरकारला काहीच करायचे नसून मुख्यमंत्रीही ठोस पावले उचलायला तयार नाही. हा प्रकार गंभीर असून यवतमाळ जिल्ह्यात आणखी मोठे आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशातील सर्वात मोठा प्रतिकात्मक पुतळा उभारला जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, कालिदास आपटे, प्रा. प्रवीण देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. एका बालकाने शेतकऱ्यांवर आधारित कविता सादर केली. त्यामुळे सर्वच भारावून गेले होते. (शहर वार्ताहर) शेतकऱ्यांना शपथ जनता दरबारात शेतकऱ्यांना एकजुटीची शपथ देण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकार कोडगे झाल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. उद्योजकांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकार पुढे सरसावत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी मात्र राज्याचा ताळेबंद बदलतो, असे सांगत असल्याबद्दल चिड व्यक्त केली गेली.