शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

पोषण आहाराचे ८८ लाख थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:31 IST

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : सात महिन्यांपासून मुख्याध्यापक अडचणीत

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाºया मध्यान्ह भोजनासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व सकस आहाराचे देयक तसेच स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधनाचे ८८ लाख रुपये थकले आहे. तालुक्यातील सर्व शाळांची एवढी मोठी बिलाची रक्कम थकल्याने ही योजना सुरू कशी ठेवावी, या विवंचनेत मुख्याध्यापक आहे.तांदूळ, डाळीसह इतर साहित्य शासन पुरविते. मात्र त्यासाठी लागणारे इंधन, भाजीपाला व पूरक आहाराची तजवीज मुख्याध्यापकांना करावी लागते. मात्र या खर्चाचे बिल गेल्या सात महिन्यांपासून मिळाले नाही. स्वयंपाकी व मदतनीस यांचे मानधनही देण्यात आले नाही. त्यामुळे या योजनेचा भार मुख्याध्यापकांवर पडल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत दररोज मध्यान्ह भोजनातून सकस आहार पुरविण्याची जबाबदारी शासनाची आहे. यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली. सर्व शाळांना तांदूळ, डाळ, तेल, मीठ, तिखट, हळद इत्यादींचा प्रत्यक्ष पुरवठा केला जातो. यासाठी लागणारे इतर साहित्य, इंधन, भाजीपाला आणि पूरक आहाराची व्यवस्था मात्र शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव या नात्याने मुख्याध्यापकांना करावी लागते. या खर्चाकरिता येणारे बिल नंतर धनादेशाद्वारे दिले जाते. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गेल्या मार्चपासून बिलच काढण्यात आले नाही. तालुक्यातील सर्व शाळांमधील १ ते ५ चे १३ हजार १८३ आणि ६ ते ८ चे ८ हजार ५८०, असे एकूण २१ हजार ७६३ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेतात. यापोटी महिन्याला शासनाने पुरविलेल्या साहित्याव्यतिरिक्त ९ लाख ८६ हजार २८६ रुपये खर्च येतो. असे सात महिन्याचे ६९ लाख ४ हजार २ रुपये होतात. त्याचबरोबर स्वयंपाकी व मदतनीस मिळून ३२२ जण आहे. त्यांच्या सहा महिन्यांच्या मानधनाचे १९ लाख ३२ हजार रुपये, असे एकूण ८८ लाख ३६ हजार २ रुपये थकले. हे सर्व पैसे थकल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.सप्टेंबरपासून केवळ तांदळाचा पुरवठासप्टेंबर महिन्यापासून या योजनेत थोडा बदल करून शाळांना केवळ तांदूळ पुरविला जाईल, अशी योजना असल्याची माहिती आहे. त्यामुळे इंधन, भाजीपाला व सकस आहारासोबत डाळ, तेल, मीठ, तिखट व हळद या वस्तूंचा भारदेखील आता मुख्याध्यापकांवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.