शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

८४० घरकुलांचा हप्ता उचलूनही बांधकाम नाही

By admin | Updated: December 16, 2014 23:02 IST

बेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे.

राजाभाऊ बेदरकर - उमरखेडबेघरांना हक्काचे घर मिळावे याउद्देशाने सुरू करण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या उद्देशाला उमरखेड तालुक्यात तडा दिला जात आहे. जवळपास ८४० घरकुलांचे हप्ते उचलून बांधकाम केलेच नसल्याचे पुढे आले आहे. हा सगळा प्रकार प्रशासनाने दलालांच्या लागेबांध्यातून सुरू असून, वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत रमाई घरकुल योजना, इंदिरा आवास योजना, कोलाम घरकुल योजना आणि राजीव गांधी क्र. १ घरकुल योजना आदी राबविण्यात येतात. परंतु या योजनांची पंचायत समितीस्तरावरच अंमलबजावणी होत असताना मुळ उद्देशाला तडा दिला जात आहे. या विविध योजनेंतर्गत राजकीय फंडा वापरून घरकुल मंजूर करून घ्यायचे, त्याबदल्यात पहिल्या हप्त्याची राजरोस उचल करायची, पुन्हा शिफारस लावून दुसरा हप्ता उचलायचा यासाठी दलालांचा आधार घ्यायचा आणि घरकुल अर्धवट सोडून शासकीय अनुदानावर डल्ला मारायचा असा काहीसा प्रकार सुरू आहे. उमरखेड पंचायत समिती अंतर्गत जवळपास ८४० घरकुलांच्या हप्त्यांची उचल करण्यात आली. परंतु बांधकाम झाले नसल्याचे दिसून येते. उमरखेड पंचायत समिती अंतर्गत २०१०-११ मध्ये रमाई घरकुल योजनेंतर्गत ७३१ घरकुल मंजूर झाले. त्यामध्ये ७१७ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता तर ७२० लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. पहिला हप्ता उचलूनही १४ घरकुलांचे काम सुरूच करण्यात आले नाही. या १४ घरकुलांचे स्पष्टीकरण प्रशासनाकडे नाही. याच योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये दोन हजार ७७१ घरकुले मंजूर झाली. यामध्ये दोन हजार ४१४ लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर दोन हजार ३६९ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल करून ३५७ घरकुलांचे बांधकामच केले नाही. याच योजनेंतर्गत २०१२-१३ या वर्षात ९५९ घरे मंजूर झाली. त्यातील ८४३ लाभार्थ्यांनी पहिला हप्ता तर ५३८ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची रक्कम उचलली. ११६ घरकुलाचे बांधकाम सुरूच झाले नाही. इंदिरा आवास योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये ४४३ घरकुले मंजूर झाली. यामध्ये ४४० लाभार्थ्यांनी पहिल्या व दुसऱ्या हप्त्याची उचल केली. परंतु तीन घरकुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. २०१२-१३ मध्ये ६७६ घरकुल मंजूर झाले. यामध्ये ५५७ लाभार्थ्यांनी पहिल्या तर ५१३ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. मात्र ९९ घरकुलाचे बांधकाम करण्यात आले नाही. २०१३-१४ मध्ये ९५१ घरकुल मंजूर करण्यात आले. यामध्ये ९०० लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर ७५० लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. ५१ घरकुलांचे बांधकाम सुरूच झाले नाही. २०१४-१५ मध्ेय ८४८ घरकुल मंजूर झाले. ६६५ लाभार्थ्यांनी पहिल्या हप्त्याची तर ३६ लाभार्थ्यांनी दुसऱ्या हप्त्याची उचल केली. १८३ घरकुलांचे बांधकाम सुरूच झाले नाही. आदिवासी कोलाम घरकुल योजनेंतर्गत २०११-१२ मध्ये ३१ घरकुले मंजूर करण्यात आली. सहा घरकुलांचे बांधकाम झालेच नाही. राजीव गांधी घरकुल योजनेंतर्गत ४६ घरकुले मंजूर करण्यात आली, त्यापैकी ११ घरकुलांचे बांधकाम झाले नाही. हप्ते उचलूनही बांधकाम सुरू न झालेल्या घरकुलांची संख्या ८४० आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा संशय आहे.