शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
2
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
3
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
4
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
5
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
6
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
7
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
8
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
9
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले
10
बफर झोनमध्ये बेकायदा इमारती; हजार कोटींच्या घोटाळ्याचा संशय; वॉचडॉग फाउंडेशनकडून चौकशीची मागणी
11
अभिनेता एजाज खानच्या अटकपूर्व जामिनावर उच्च न्यायालयात उन्हाळी सुट्टीनंतर होणार सुनावणी
12
CSMT स्थानकात आता 'दिव्यांग फ्रेंडली' सुविधा; तिकीट काउंटर, पार्किंग, शौचालयांमध्ये सोय
13
रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा
14
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
15
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
16
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
17
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
18
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
19
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
20
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई

कर्ज पुनर्गठनासाठी हवे ८०८ कोटी

By admin | Updated: May 25, 2016 00:03 IST

दुष्काळी परिस्थितीने २००९-१० पासून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही.

सहकार विभाग : कर्जदार शेतकऱ्यांचा अहवाल मागविलायवतमाळ : दुष्काळी परिस्थितीने २००९-१० पासून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. अशा शेतकऱ्यांचा अहवाल सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी मागविला आहे. या थकित कर्जाच्या पुनर्गठणासाठी जिल्ह्याला ८०८ कोटी रूपये लागणार आहे. यानंतर दीड लाख शेतकरी नव्याने कर्जास पात्र ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच पुनर्गठनाचे भवितव्य ठरणार आहे.दुष्काळ आणि गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २००९, २०१० पासून कर्जाची परतफेड करता आली नाही. या कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. यामुळे सव्वा लाख शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. या शेतकऱ्यांनी ४८७ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. परतफेड न झाल्याने त्यावर २०२ कोटींचे व्याज चढले आहे. तर २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये २९ हजार २१० शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठणासाठी ११२ कोटी लागणार आहेत. ही संपूर्ण रक्क म ८०८ कोटी रूपयांच्या घरात जाते. यामुळे एक लाख ४६ हजार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र राज्य शासनाने २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या कर्ज पुनर्गठणाचे पत्र काढले आहे. इतर बाबतीत केवळ अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २००९ पासूनच्या पुनर्गठणाचा विचार झाल्यास दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. प्रधान सचिवांनी अहवाल मागविल्याने कुठला तरी निर्णय होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पेरणीपूर्वी निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. (शहर वार्ताहर)सावकाराचे उंबरठे झिजवावे लागणार कर्ज पुनर्गठणासाठी किती रूपये लागतील याचा अहवाल आयुक्तांनी मागविला आहे. यावर कुठलाही धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नाही. पेरणी तोंडावर आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सावकाराचे उंबरठे झिजवावेच लागतील.