शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज पुनर्गठनासाठी हवे ८०८ कोटी

By admin | Updated: May 25, 2016 00:03 IST

दुष्काळी परिस्थितीने २००९-१० पासून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही.

सहकार विभाग : कर्जदार शेतकऱ्यांचा अहवाल मागविलायवतमाळ : दुष्काळी परिस्थितीने २००९-१० पासून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. अशा शेतकऱ्यांचा अहवाल सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी मागविला आहे. या थकित कर्जाच्या पुनर्गठणासाठी जिल्ह्याला ८०८ कोटी रूपये लागणार आहे. यानंतर दीड लाख शेतकरी नव्याने कर्जास पात्र ठरणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवरच पुनर्गठनाचे भवितव्य ठरणार आहे.दुष्काळ आणि गारपिटीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २००९, २०१० पासून कर्जाची परतफेड करता आली नाही. या कर्जाचे पुनर्गठण झाले नाही. यामुळे सव्वा लाख शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले नाही. या शेतकऱ्यांनी ४८७ कोटी रूपयांचे कर्ज घेतले होते. परतफेड न झाल्याने त्यावर २०२ कोटींचे व्याज चढले आहे. तर २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये २९ हजार २१० शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठणासाठी ११२ कोटी लागणार आहेत. ही संपूर्ण रक्क म ८०८ कोटी रूपयांच्या घरात जाते. यामुळे एक लाख ४६ हजार शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र राज्य शासनाने २०१४-१५ आणि २०१५-१६ च्या कर्ज पुनर्गठणाचे पत्र काढले आहे. इतर बाबतीत केवळ अहवाल मागविण्यात आला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २००९ पासूनच्या पुनर्गठणाचा विचार झाल्यास दीड लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. प्रधान सचिवांनी अहवाल मागविल्याने कुठला तरी निर्णय होणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पेरणीपूर्वी निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. (शहर वार्ताहर)सावकाराचे उंबरठे झिजवावे लागणार कर्ज पुनर्गठणासाठी किती रूपये लागतील याचा अहवाल आयुक्तांनी मागविला आहे. यावर कुठलाही धोरणात्मक निर्णय अद्याप झाला नाही. पेरणी तोंडावर आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सावकाराचे उंबरठे झिजवावेच लागतील.