शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
4
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
5
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
6
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
7
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
8
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
9
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
10
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
11
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
12
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
13
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
14
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
15
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
16
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
17
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
18
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
19
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
20
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा

८०० गावांना ‘आॅडिटर’ची प्रतीक्षा

By admin | Updated: December 29, 2014 23:50 IST

जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ८०० ग्रामपंचायतींचे गेल्या तीन वर्षांपासून लेखा परीक्षणच झाले नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आॅडिटच झाले नसल्याने

लोकल फंडचा कारभार : तीन वर्षांपासून ११ तालुक्यातील गैरव्यवहार गुलदस्त्यात यवतमाळ : जिल्ह्यातील ११ तालुक्यातील तब्बल ८०० ग्रामपंचायतींचे गेल्या तीन वर्षांपासून लेखा परीक्षणच झाले नसल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आॅडिटच झाले नसल्याने यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेले आर्थिक गैरव्यवहार अद्याप गुलदस्त्यात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर आॅडिटच्या माध्यमातून स्थानिक निधी लेखा विभागाचा अंकुश असतो. या विभागामार्फत जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा, ग्रामपंचायती आणि संकीर्ण संस्थांचे लेखा परीक्षण केले जाते. यापैकी प्रमुख संस्थांचे आॅडिट नियमित होत असले तरी ग्रामपंचायती यात मागे पडत आहेत. जिल्ह्यातील १६ पैकी केवळ वणी, उमरखेड, पुसद, महागाव आणि मारेगाव या पाचच तालुक्यातील ग्रामपंचायतींचे आॅडिट झाले आहे. उर्वरित ११ तालुक्यातील सुमारे ८०० ग्रामपंचायतींचे सन २०१०-११, २०११-१२ आणि २०१२-१३ या तीन वर्षांचे आॅडिटच अद्याप झाले नाही. त्यामुळे यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये झालेले घोटाळे, गैरव्यवहार, अनियमितता आपसुकच दडपल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायतींना स्थानिक विकास कामे, आमदार-खासदार निधी, दलित वस्ती सुधार निधी, तांडा वस्ती सुधार निधी, पाणी टंचाई निवारण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना आदी माध्यमातून पैसा येतो. त्याचा खर्च नियमानुसार होतो की नाही याचा हिशेब तपासण्याची जबाबदारी स्थानिक निधी लेखा विभागाकडे (लोकल फंड) आहे. मात्र हा विभाग ही जबाबदारी सांभाळण्यात अपयशी ठरतो आहे.लोकल फंडकडे लेखा परीक्षणासाठी पुरेसे आॅडिटर नाहीत, जिल्ह्यासाठी २६ आॅडिटर मंजूर आहेत. या जागा भरल्या आहेत. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या व कामाचा व्याप पाहता आॅडिटरची ही संख्या तुटपुंजी ठरते आहे. पूर्वी आॅडिटरला प्रत्येक महिन्याला किमान दहा ग्रामपंचायती दिल्या जात होत्या. महिन्याचे कामकाजाचे २० ते २२ दिवस लक्षात घेता या कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींचे आॅडिट करणे शक्यच नव्हते. मात्र पाच ग्रामपंचायतींचे प्रत्यक्षात आणि पाच ग्रामपंचायतींचे केवळ कागदोपत्री आॅडिट दाखवून ही खानापुरती केली जात होती. आता मात्र एका आॅडिटरला त्याच्या क्षमतेनुसार केवळ चार ग्रामपंचायतींचे आॅडिट देण्याचा पायंडा पडला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आॅडिट होत असले तरी प्रलंबित ग्रामपंचायतींची संख्या प्रचंड वाढली आहे. ८०० ग्रामपंचायतींचे तीन वर्षांपासून आॅडिट होऊ शकलेले नाही. आधीच केवळ चार ग्रामपंचायती आॅडिटसाठी मिळत असतानाही त्यात हलगर्जीपणा केला जात आहे. एका लेखा परीक्षकाने मार्चपासून अद्यापही आपले आॅडिट रिपोर्ट सादर केलेले नाही. या आॅडिटरच्या वागण्याने अधिकारी हतबल झाले आहे. अखेर या आॅडिटरला मौखिक आदेशाने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात ऐकायला मिळते. पुसद तालुक्यातील धनकेश्वर, महागाव, वणी तालुक्यातील चिखलगाव येथील अनेक घोटाळे दडपले गेल्याचे सांगण्यात येते. (जिल्हा प्रतिनिधी)