शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

उपविभागातील ७० गावे अंधारात

By admin | Updated: May 29, 2017 00:42 IST

वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले.

१३५ विद्युत खांब जमीनदोस्त : महावितरणचे २० लाखांचे नुकसान, पावसाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळामुळे उपविभागातील ७० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून तब्बल १३५ विद्युत खांब वाकले आहे. यात महावितरणचे जवळपास २० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर काही वेळाताच सोसाट्याचा वाराही सुटला व अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. या पवसाचा वेग इतका तीव्र होता की, समोरून येणारे कोणतेही वाहन दृष्टीस पडत नव्हते. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही इतका जबरदस्त होता की, वणी येथील विश्रामगृहावरील संपूर्ण छप्पर व पोलीस ठाण्यातील सौर यंत्रणाही कोलमडून पडली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा विभागात या वादळी वाऱ्यामुळे जवळपास १३५ विद्युत खांब कोसळले. त्यामुळे या चारही तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी रात्रीच काही अभियंते व कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे पुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत होता. खांब मोडून खाली पडल्यामुळे ताराही जमिनीवर लोंबकळत होत्या. रविवारी सकाळीच या चारही तालुक्यातील विद्युत केंद्र व उपकेंद्रातील कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदारांच्या कामगारांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश गावातील विद्युत पुरवठा सुरू झाला होता. मात्र शनिवारी रात्री तब्बल ७० गावांना अंधारातच रात्र काढावी लागली. रविवारी दुपारपर्यंतही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे गावखेड्यातील नळयोजनेवर त्याचा चांगलाच परिणाम झाला. सध्या विहिरीची पातळी खोल गेल्याने गावकऱ्यांना नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र रविवारी पाणी पुरवठा न झाल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागले. या वादळी वाऱ्यामुळे वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील सर्व मार्गावरील झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालकांना वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागला. झरी तालुक्यात सध्या भूईमुग काढण्याचे काम सुरू होते. भूईमुग काल्यानंतर शेतकऱ्यांना कुटाराचा शेतातच ढिग लावला होता. या कुटाराचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा कुटार ओला झाला असून तो आता बिनकामाचा झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत शनिवारी बरसलेल्या या पावसामुळे अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.