शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

उपविभागातील ७० गावे अंधारात

By admin | Updated: May 29, 2017 00:42 IST

वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले.

१३५ विद्युत खांब जमीनदोस्त : महावितरणचे २० लाखांचे नुकसान, पावसाचा फटका लोकमत न्यूज नेटवर्क वणी : वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळामुळे उपविभागातील ७० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून तब्बल १३५ विद्युत खांब वाकले आहे. यात महावितरणचे जवळपास २० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर काही वेळाताच सोसाट्याचा वाराही सुटला व अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. या पवसाचा वेग इतका तीव्र होता की, समोरून येणारे कोणतेही वाहन दृष्टीस पडत नव्हते. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही इतका जबरदस्त होता की, वणी येथील विश्रामगृहावरील संपूर्ण छप्पर व पोलीस ठाण्यातील सौर यंत्रणाही कोलमडून पडली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा विभागात या वादळी वाऱ्यामुळे जवळपास १३५ विद्युत खांब कोसळले. त्यामुळे या चारही तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी रात्रीच काही अभियंते व कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे पुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत होता. खांब मोडून खाली पडल्यामुळे ताराही जमिनीवर लोंबकळत होत्या. रविवारी सकाळीच या चारही तालुक्यातील विद्युत केंद्र व उपकेंद्रातील कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदारांच्या कामगारांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश गावातील विद्युत पुरवठा सुरू झाला होता. मात्र शनिवारी रात्री तब्बल ७० गावांना अंधारातच रात्र काढावी लागली. रविवारी दुपारपर्यंतही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे गावखेड्यातील नळयोजनेवर त्याचा चांगलाच परिणाम झाला. सध्या विहिरीची पातळी खोल गेल्याने गावकऱ्यांना नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र रविवारी पाणी पुरवठा न झाल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागले. या वादळी वाऱ्यामुळे वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील सर्व मार्गावरील झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालकांना वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागला. झरी तालुक्यात सध्या भूईमुग काढण्याचे काम सुरू होते. भूईमुग काल्यानंतर शेतकऱ्यांना कुटाराचा शेतातच ढिग लावला होता. या कुटाराचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा कुटार ओला झाला असून तो आता बिनकामाचा झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत शनिवारी बरसलेल्या या पावसामुळे अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.