शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

७० टक्के पेरण्या खासगी कर्जावर

By admin | Updated: June 25, 2015 02:33 IST

पुनर्गठनाचा वांदा, बँकांचा असहकार आणि जाचक अटींमुळे जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना खासगी कर्ज घेऊन पेरणी करावी लागली.

पुनर्गठनाचा वांदा : बँकांचा वाटा केवळ ३३ टक्केरूपेश उत्तरवार यवतमाळ पुनर्गठनाचा वांदा, बँकांचा असहकार आणि जाचक अटींमुळे जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांना खासगी कर्ज घेऊन पेरणी करावी लागली. केवळ ३२ टक्के शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध झाले. काही शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज उपलब्ध झाले नसल्याने त्यांची शेती पडिक राहण्याची भीती आहे. सलग तीन वर्षांपासून निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीने शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. यावर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश दिले. असे असले तरी, अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी कानाडोळा केला. एकूण थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी केवळ सहा हजार शेतकऱ्यांच्याच कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. सव्वातीन लाख शेतकरी कर्जास मुकले. अशा शेतकऱ्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी सावकाराचे दार ठोठावावे लागले.जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरण्यापैकी केवळ ३० टक्के शेतकऱ्यांनाच बँकांकडून कर्ज उपलब्ध झाले. इतर ७० टक्के शेतकऱ्यांना घरातील दागिने गहान ठेवून, नातेवाईकांकडून उसणनवार घेऊन, खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन बियाण्यांची खरेदी करावी लागली. गतवर्षीचे कर्ज डोक्यावरून उतरत नाही तोच, आता पुन्हा या शेतकऱ्यांना खासगी कर्ज घ्यावे लागले. आता या शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा वांदा सुपष्टात येऊन पीक कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे.मुख्यमंत्र्यांनी कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश दिले असले तरी अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी ही बाब टाळली आहे. इतकेच नव्हे तर, काही बँकांनी या संदर्भातील अहवाल सहकार आयुक्तांना निरंक दिला आहे. यामुळे किती शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन होणार, किती शेतकऱ्यांना वाटप केले याची माहितीच प्रशासनाकडे नाही. यावरून राष्ट्रीयीकृत बँका शेतकऱ्यांचे किती हित जोपासते हे दिसून येते. चार लाख शेतकरी सदस्यांपैकी केवळ ७४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी कर्ज उपलब्ध करून दिले आहेत. इतर सव्वातीन लाख शेतकऱ्यांनी बँकेचे उंबरठे झिजविले. बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार दिला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना इतर मार्गाने रकमेची जुळवाजुळव करावी लागली. काहींना तर सावकारांनीही कर्जास नकार दिला आहे. कृषी सेवा केंद्रानीही उधारीमध्ये बियाणे, खते दिले नाही. यामुळे आता पेरणीचे ३० टक्के म्हणजे तीन लाख हेक्टर क्षेत्र पडित पडण्याचा धोका वर्तविला जात आहे.