शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

५० गावांचा पाणीप्रश्न सुटणार

By admin | Updated: April 20, 2017 00:28 IST

जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली.

तीन प्रकल्पातून पाणी सोडले : नागरिकांच्या आंदोलनानंतर घेतली दखल यवतमाळ : जिल्ह्यातील ३४२ प्रकल्पांनी तळ गाठला. यामुळे प्रकल्पालगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई तीव्र झाली. यामुळे जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यातून ५० गावांतील पाणी टंचाईची समस्या सुटण्यास मदत मिळणार आहे. पाणीटंचाई निवारणासाठी अनेक प्रकल्पांतील पाणी आरक्षित करण्यात आले आहे. काही गावांमध्ये भीषण स्थिती निर्माण झाल्याने नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी तेथील गामस्थांनी केली होती. त्याबाबत पाटबंधारे विभागाकडे हा प्रस्ताव विचाराधीन होता. अखेर पाटबंधारे विभागाने सोमवारी सायंकाळी तीन प्रकल्पातील पाणी सोडण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. यामुळे या प्रकल्पातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवरील इसापूर धरण क्षेत्रात येणाऱ्या ४५ गावांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. प्रथम पाणी सोडल्यानंतरही काही गावापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे नागरिक उपोषणाला बसले होते. त्याची दखल घेत सोमवारी तीन दशलक्ष घनमीटर पाणी पुन्हा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. हे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. यामुळे उमरखेड तालुक्यातील उंचवडद व तिवडीपर्यंत पाणी पोहोचणार असल्याने ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय वाघाडी प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने येळाबारा, सायखेडा आणि बेलखेडा येथील नागरिकांना पाणी मिळणार आहे. अंतरगाव प्रकल्पातून ०.११ दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आल्याने पालोती, पन्हाळगाव व अंतरगाव येथील पाणीटंचाई निवारणास मत मिळणार आहे. (शहर वार्ताहर)