शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्हा बँकेचे ५० हजार शेतकरी कर्जाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: May 19, 2016 02:04 IST

खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेले तब्बल ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.

शिखर बँकेने अर्थचक्र थांबविले : एक लाख शेतकऱ्यांच्या शासनाकडे नजरा यवतमाळ : खरिपाचा हंगाम तोंडावर आला असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद असलेले तब्बल ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. राज्य सहकारी बँकेच्या कर्ज मंजुरीवर या शेतकऱ्यांच्या कर्जाचे भवितव्य अवलंबून आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने आतापर्यंत ४५६ कोटींच्या उद्दिष्टापैकी १२५ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. परंतु आता जिल्हा बँकेकडील कर्जासाठीचा निधी संपला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य सहकारी बँकेकडे ३०० कोटींच्या कर्जाची मागणी केली आहे. मात्र हे कर्ज अद्याप मंजूर झालेले नाही. दरवर्षी एप्रिल अखेर शिखर बँक कर्ज मंजूर करीत असताना यावर्षीच विलंब का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेने घेतलेले कर्ज मार्चपूर्वी न भरल्याचा हा फटका मानला जात आहे. शिखर बँकेच्या कर्जमंजुरीअभावी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पीक कर्जाचे जणू अर्थचक्र थांबले आहे. राज्य सहकारी बँक २३० कोटींचे कर्ज मंजूर करण्याची आशा जिल्हा बँकेला आहे. मात्र त्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार याकडे जिल्हा बँक व शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. किमान मे महिना संपण्यापूर्वी शिखर बँकेच्या कर्जाचा निर्णय व्हावा, अशी जिल्हा बँकेची अपेक्षा आहे. शिखर बँकेने हातवर केल्यास ५० हजार शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुळात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दीड लाख सभासद आहेत. मात्र त्यापैकी एक लाख सभासद थकबाकीदार आहेत. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जाणार आहे. अर्थात त्यांनी गतवर्षी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांना पाच हप्ते पाडून दिले जाणार आहे. परंतु या एक लाख शेतकऱ्यांना नवे कर्ज द्यायचे की नाही, याचा निर्णय राज्य शासन घेणार आहे. या एक लाख शेतकऱ्यांचा चेंडू आता शासनाच्या कोर्टात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)