शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
4
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
5
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
6
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
7
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
8
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
10
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
11
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
12
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
13
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
14
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
15
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
16
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
17
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
18
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
19
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
20
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 

पाणीपुरवठा बिलात ५० टक्के सवलत

By admin | Updated: December 11, 2015 03:00 IST

जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समिती व स्वच्छता समितीच्या सभेत पाणीटंचाई आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

जलव्यवस्थापन समिती सभा : पाणीटंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देशयवतमाळ : जिल्हा परिषदेतील जलव्यवस्थापन समिती व स्वच्छता समितीच्या सभेत पाणीटंचाई आराखड्यावर चर्चा करण्यात आली. अनेक ठिकाणी नळ योजनांचे वीज बिल थकीत राहते. यामुळेच पाणीटंचाई निर्माण होते. यावर उपाय म्हणून ३१ मार्चपूर्वी थकीत वीज बिलापैकी ५० टक्केच रकमेचा भरणा करण्याची सवलत देण्यात आली आहे. ही बाब वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी या बैठकीत सांगितले.पाणीटंचाईसोबत स्वच्छतेचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी घेतला. सर्व गटविकास अधिकाऱ्यांना त्वरित टंचाई आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. हातपंप दुरुस्तीसाठी प्रत्येक पंचायत समितीत टंचाई सेल उघडून त्याचा नियमित अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले. जास्तीत जास्त गावे टँकरमुक्त करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यास सांगितले. पुसद तालुक्यातील हर्षी व माळपठार या पाणीपुरवठा योजनेला पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, म्हणून टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता व पुसद विभागातील कार्यकारी अभियंत्याला बैठकीस बोलविण्यात आले होते. तांत्रिक अडचण असल्याने हा वीज पुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याचे अभियंत्यांनी सांगितले. यावरच लवकरच तोडगा काढणार असल्याची ग्वाही दिली. स्वच्छतेच्या दृष्टीकोणातून बाभूळगाव तालुक्याची १०० टक्के हागणदारीमुक्त करण्यासाठी निवड करण्यात आली. हे उद्दीष्ट यावर्षीचे पूर्ण करण्यात यावे, असे अध्यक्षांनी सांगितले. यासाठी गुडमॉर्निंग पथक तयार करून गटविकास अधिकाऱ्यांनी अकस्मात भेट देऊन पडताळणी करावी, असेही निर्देश देण्यात आले. या बैठकीला उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुळकर्णी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, १६ ही पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)