शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

४० गावातील नागरिक सोसत आहे असह्य वेदना

By admin | Updated: January 9, 2016 02:59 IST

परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे.

पारवा : परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे. लाखो रुपये खर्च करून उभी झालेली ही वास्तू बेवारस स्थितीत आहे. बसस्थानकाच्या आवारात बस थांबणे आणि पुढे निघून जाणे एवढ्यापुरताच उपयोग या ठिकाणी होतो आहे. आठ वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या आवाराचे डांबरीकरण करण्यात आले होते. यानंतर साधी डागडुजी करण्याचेही सौजन्य महामंडळाने दाखविले नाही. आता जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एसटी बस आवारात पोहोचते त्यावेळी त्यातील प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे पायदळ निघालेल्या नागरिकांनाही अपघात होण्याची भीती आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात अंधार असतो. वीज पुरवठा खंडित झाला असल्याने एकही दिवा बसस्थानकात नाही. रात्रीच्यावेळी बसस्थानकात थांबण्याची कुणी हिम्मत करत नाही. या दुरावस्थेमुळेच बसस्थानकाच्या आवारात शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयही याठिकाणी नाही. उपहारगृह बांधल्यापासूनच सुरू झालेले नाही. सहा महिन्यांपूर्वी आमदार राजू तोडसाम यांनी या बसस्थानकाची पाहणी करून ‘अच्छे दिन’ची आशा पल्लवीत केली होती. मात्र अजून तरी हा मुहूर्त निघालेला नाही. या बसस्थानकावरून दररोज ४५ ते ५० फेऱ्या धावतात. यात लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, मांडवी, किनवट, आदिलाबाद, आर्णी यासह नागपूर आणि नांदेडसाठीही येथून बसची ये-जा सुरू असते. यातील काही बसेस तर गेली २० वर्षांपासून येथून धावतात. यानंतरही बसस्थानकामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. (वार्ताहर)