शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
8
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
9
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
10
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
11
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
12
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
13
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
14
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
15
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
16
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
17
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
18
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
19
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
20
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो

४० गावातील नागरिक सोसत आहे असह्य वेदना

By admin | Updated: January 9, 2016 02:59 IST

परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे.

पारवा : परिसरातील सुमारे ४० ते ४५ गावातील नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आलेल्या येथील बसस्थानकाला विविध समस्यांनी वेढले आहे. लाखो रुपये खर्च करून उभी झालेली ही वास्तू बेवारस स्थितीत आहे. बसस्थानकाच्या आवारात बस थांबणे आणि पुढे निघून जाणे एवढ्यापुरताच उपयोग या ठिकाणी होतो आहे. आठ वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या आवाराचे डांबरीकरण करण्यात आले होते. यानंतर साधी डागडुजी करण्याचेही सौजन्य महामंडळाने दाखविले नाही. आता जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. एसटी बस आवारात पोहोचते त्यावेळी त्यातील प्रवाशांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो. खड्ड्यांमुळे पायदळ निघालेल्या नागरिकांनाही अपघात होण्याची भीती आहे. बसस्थानकाच्या संपूर्ण परिसरात अंधार असतो. वीज पुरवठा खंडित झाला असल्याने एकही दिवा बसस्थानकात नाही. रात्रीच्यावेळी बसस्थानकात थांबण्याची कुणी हिम्मत करत नाही. या दुरावस्थेमुळेच बसस्थानकाच्या आवारात शौचास बसण्याचे प्रकार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोयही याठिकाणी नाही. उपहारगृह बांधल्यापासूनच सुरू झालेले नाही. सहा महिन्यांपूर्वी आमदार राजू तोडसाम यांनी या बसस्थानकाची पाहणी करून ‘अच्छे दिन’ची आशा पल्लवीत केली होती. मात्र अजून तरी हा मुहूर्त निघालेला नाही. या बसस्थानकावरून दररोज ४५ ते ५० फेऱ्या धावतात. यात लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांचाही समावेश आहे. यवतमाळ, पांढरकवडा, घाटंजी, मांडवी, किनवट, आदिलाबाद, आर्णी यासह नागपूर आणि नांदेडसाठीही येथून बसची ये-जा सुरू असते. यातील काही बसेस तर गेली २० वर्षांपासून येथून धावतात. यानंतरही बसस्थानकामध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत प्रवासी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. (वार्ताहर)