शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

३१ महिन्यांत वाघाने घेतले १२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:44 IST

गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे.

ठळक मुद्देदोन तालुके, १६ गावे दहशतीत : २० हजार नागरिकांवर परिणाम, वन विभागाविरूद्ध रोष

के.एस. वर्र्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे.पावसाळ्यात सर्वाधिक, हिवाळ्यात कमी, तर उन्हाळ्यात अपवादात्मक हल्ले वाघांनी केले आहे. शनिवार, रविवार व सणाच्या दिवसात हल्ल्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने आगामी काळात चिंता वाढली आहे. मात्र वन विभाग या वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरला आहे. वाघाने रामजी शेंदरे, रा.लोणी यांचा २७ जानेवारी २०१८ रोजी दहावा बळी घेतल्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांनी वाघिणीस ठार मारण्याचा आदेश दिला होता. ३० जानेवारीला वन्यप्रेमी सरीना सुब्रण्यम व डॉ. जेरील वनाईत यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयाने वाघ मारण्याच्या आदेशाला स्थगनादेश दिला. त्यांनी वाघिण गर्भार आहे, वाघिणीची योग्य ओळख पटविण्यात आलीे नाही, १२ पैकी केवळ तीनच बळी वाघिणीने घेतले, इतर बळी दुसऱ्या वाघाने घेतल्याने संशयास्पद स्थिती असल्याचे याचिकेत नमूद केले होते.तत्पूर्वी एनटीसीत (नॅशनल टायगर कंझरवेन आथरिटी) डेहराडूनच्या पथकाने केळापूर तालुक्यात दौरा करून माहिती घेतली. नेमका त्याच वेळी वाघाने दहावा बळी घेतला. त्यापूर्वी १६ सप्टेबर २०१७ रोजी राळेगाचे एसडीओ संदीपकुमार अपार यांचे शासकीय वाहन वन विभागाचे वाहन समजून सखी येथे गावकºयांनी जाळले होते. नंतर २८ जानेवारी २०१८ रोजी मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी राळेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. यामुळेच २४ फेब्रुवारी २०१८ रोजी मुख्य वनसंरक्षक चव्हाण यांची पुण्याला बदली आहे. नंतर २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रधान मुख्य संरक्षक (वन्यजीव) नागपूर श्रीराम बाबू यांनी वाघ पिडीत क्षेत्रातील अनेक गावांना भेटी दिल्या. काही निर्देश दिले. मात्र त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे.१० आॅक्टोबर २०१८ रोजी वाघ पिडीत ग्रामीणांचा राळेगाव उपविभागीय कार्यालयावर मोर्चा धडकला. त्यानंतर ‘टी वन टायगर मिशन’ अनेक प्रयत्नानंतरही अपयशी ठरले. उपविभागीय अधिकाºयांचे शासकीय वाहन जाळल्यानंतर शासनाद्वारे तडकाफडकी अनेक उपाययोजना सुरू करण्यात आल्या. टी.वन टायगर मिशन त्यापैकी एक होते. सप्टेबर २०१७ च्या अखेर ते जानेवारी २०१८ च्या मध्यापर्यंत, या अंतर्गत या क्षेत्रात ६० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. अनेक ठिकाणी उंच मचाणी लावण्यात आल्या. पाच ठिकाणी वाघास पकडण्याकरिता पिंजºयात जिवंत शिकार ठेवण्यात आल्या. २५ वाहनांद्वारे पाच वनक्षेत्रातील १०० तज्ज्ञ वन कर्मचाऱ्यांचे व प्रत्येक पथकात तरबेज शुटर असलेली पथके कामी लावण्यात आली होती. ताडोबा येथील ‘गणराज’ हत्तीला वाघाच्या शोधार्थ पाचारण करण्यात आले होते. मात्र हत्ती मदहोश झाल्याने २० किलोमीटर पळून गेला. याशिवाय हैद्राबाद, बेंगलोर, दिल्ली येथील खासगी शार्प शुटर येऊन रिकाम्या हाताने परतले. वन खात्यातील तामिळनाडू येथील तज्ज्ञांनीसुद्धा येथे भेटी देऊन तळ ठोकला. टिप्स दिल्या. पण त्याचाही उपयोग झाला नाही.(१) सोनाबाई भोसले, बोराटी, ६.१,२०१६, (२) मारोती नागोसे, रा.खैरगाव, ९/३/२०१६, (३) सखाराम टेकाम, झोटींगधरा, ९/४/२०१६, (४) प्रवीण सोनवणे, तेजनी, ३०/१०/२०१६, (५) लक्ष्मी रामपूरे, जिरामिरा (केळापूर), २२/७/२०१७, (६) गजानन पवार, सराटी, २५/८/२०१७, (७) सतीश कोवे, सखी, १६/९/२०१७, (८) शंकर आत्राम, जिरा (केळापूर), १५/१०/२०१७, (९) चटकू फुकटी, विहीरगाव, १२/९/२०१७, (१०) रामजी शेंदरे, लोणी, २७/८/२०१८, (११)गुलाब मोकाशी, वेडशी, ४/८/२०१८, (१२) वाघू राऊत, विहीरगाव, ११/८/२०१८.

टॅग्स :Tigerवाघ