शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

३० टक्के बंगाली सुवर्ण कारागिरांना सक्तीची रजा

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले.

नोटाबंदीची झळ : सराफा व्यवसायात ६० टक्के घट यवतमाळ : नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले. कामेच येत नसल्याने यातील ३० टक्के बंगाली कारागिरांना त्यांच्या मूळगावी परतावे लागले. अद्यापही सराफा व्यवसाय सुरळीत झालेला नाही. त्यामुळे १५-२० दिवसांची सक्तीची सुट्टी भोगूनही त्यांना परतणे अवघड झाले आहे. येथील सराफा बाजारात साधारण ३०० गठई कारागिरांची रोजीरोटी चालते. यात १०० पेक्षा अधिक कारागीर हे बंगाली आहेत. एखाद्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात किंवा मोठ्या कारागीराच्या हाताखाली ते काम करतात. ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर सोन खरेदीवर विपरित परिणाम झाला. सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतानाही खरेदी वाढलेली नाही. ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत धंदा खाली आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याची खरेदीच होत नसल्याने कारागिरांना कामे मिळेनाशी झाली. त्यामुळे यवतमाळातील जवळपास ४० कारागीर आपल्या मूळगावी निघून गेले आहेत. त्यांचे सहकारी संजय सामंता आणि सजल सामंता म्हणाले, हुगळी, मिदनापूर येथील कारागीर परत गेले आहेत. आमचाही जाण्याचा विचार आहे. मात्र मुलांची शाळा असल्यामुळे जाता येत नाही. हीच स्थिती स्थानिक कारागिरांचीही आहे. विनोद रूणवाल म्हणाले, पूर्वी एका दिवसात २-३ गोफ किंवा पोतचे काम करायचो. आता हप्त्यातून एखादा गोफ मिळाला तर मिळतो. गावाकडे गेलेले कारागीर परत येऊ का म्हणून रोज फोन करतात. पण त्यांना सध्या तरी बोलवणे शक्य नाही. त्यांचाच सहकारी नीलेश कुर्वे म्हणाला, नोटाबंदीनंतर कामेच बंद झाली. त्यामुळे मला १५ दिवसांची सुट्टी देण्यात आली. मी मालखेडला जाऊन आलो. पण आताही कामं नाही. पेट्रोलचा खर्चही निघत नाही. काहीच कमाई नसल्याने कारागिरांचे घरभाडेही थकल्याची माहिती श्री संत नरहरी सुवर्णकार कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज दहीवाल यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) तालुका पातळीवरील व्यवसाय ठप्पच नाटाबंदीच्या परिणामांवर मात करीत यवतमाळातील व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. मात्र तालुका पातळीवरील सर्व व्यवहार अद्यापही ठप्पच आहेत. तालुका पातळीवरील सराफा व्यावसायिकांकडून यवतमाळातील कारागिरांकडे अनेक कामे येतात. यात बाभूळगाव, घाटंजी, पांढरकवडा, नेर, आर्णीतून मोठी आवक असते. परंतु, सध्या नोटाबंदीमुळे तालुक्यातून येणारी कामे पूर्णत: बंद आहेत. जे व्यावसायिक कार्ड किंवा धनादेश स्वीकारत आहेत, त्यांचा धंदा कसाबसा सुरू आहे. पण इतरांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. अनेक लोक केवळ अंगठीवर लग्न आटोपत असल्याने कारागिरांना कामे मिळणे कठीण झाले आहे. बंगाली कारागीर त्यामुळेच गावाकडे परत गेले आहेत. - सारंग भालेराव, अध्यक्ष सराफ व्यापारी असोसिएशन, यवतमाळ