शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

३० टक्के बंगाली सुवर्ण कारागिरांना सक्तीची रजा

By admin | Updated: January 1, 2017 02:17 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले.

नोटाबंदीची झळ : सराफा व्यवसायात ६० टक्के घट यवतमाळ : नोटाबंदीच्या निर्णयानंतर येथील सराफा ओळीतील गठई कारागीर रिकामे झाले. कामेच येत नसल्याने यातील ३० टक्के बंगाली कारागिरांना त्यांच्या मूळगावी परतावे लागले. अद्यापही सराफा व्यवसाय सुरळीत झालेला नाही. त्यामुळे १५-२० दिवसांची सक्तीची सुट्टी भोगूनही त्यांना परतणे अवघड झाले आहे. येथील सराफा बाजारात साधारण ३०० गठई कारागिरांची रोजीरोटी चालते. यात १०० पेक्षा अधिक कारागीर हे बंगाली आहेत. एखाद्या सराफा व्यावसायिकाच्या दुकानात किंवा मोठ्या कारागीराच्या हाताखाली ते काम करतात. ८ नोव्हेंबरला नोटाबंदी झाल्यानंतर सोन खरेदीवर विपरित परिणाम झाला. सध्या लग्नाचा धुमधडाका सुरू असतानाही खरेदी वाढलेली नाही. ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत धंदा खाली आल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. सोन्याची खरेदीच होत नसल्याने कारागिरांना कामे मिळेनाशी झाली. त्यामुळे यवतमाळातील जवळपास ४० कारागीर आपल्या मूळगावी निघून गेले आहेत. त्यांचे सहकारी संजय सामंता आणि सजल सामंता म्हणाले, हुगळी, मिदनापूर येथील कारागीर परत गेले आहेत. आमचाही जाण्याचा विचार आहे. मात्र मुलांची शाळा असल्यामुळे जाता येत नाही. हीच स्थिती स्थानिक कारागिरांचीही आहे. विनोद रूणवाल म्हणाले, पूर्वी एका दिवसात २-३ गोफ किंवा पोतचे काम करायचो. आता हप्त्यातून एखादा गोफ मिळाला तर मिळतो. गावाकडे गेलेले कारागीर परत येऊ का म्हणून रोज फोन करतात. पण त्यांना सध्या तरी बोलवणे शक्य नाही. त्यांचाच सहकारी नीलेश कुर्वे म्हणाला, नोटाबंदीनंतर कामेच बंद झाली. त्यामुळे मला १५ दिवसांची सुट्टी देण्यात आली. मी मालखेडला जाऊन आलो. पण आताही कामं नाही. पेट्रोलचा खर्चही निघत नाही. काहीच कमाई नसल्याने कारागिरांचे घरभाडेही थकल्याची माहिती श्री संत नरहरी सुवर्णकार कामगार संघटनेचे अध्यक्ष मनोज दहीवाल यांनी दिली. (स्थानिक प्रतिनिधी) तालुका पातळीवरील व्यवसाय ठप्पच नाटाबंदीच्या परिणामांवर मात करीत यवतमाळातील व्यवसाय आता हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. मात्र तालुका पातळीवरील सर्व व्यवहार अद्यापही ठप्पच आहेत. तालुका पातळीवरील सराफा व्यावसायिकांकडून यवतमाळातील कारागिरांकडे अनेक कामे येतात. यात बाभूळगाव, घाटंजी, पांढरकवडा, नेर, आर्णीतून मोठी आवक असते. परंतु, सध्या नोटाबंदीमुळे तालुक्यातून येणारी कामे पूर्णत: बंद आहेत. जे व्यावसायिक कार्ड किंवा धनादेश स्वीकारत आहेत, त्यांचा धंदा कसाबसा सुरू आहे. पण इतरांचा व्यवसाय डबघाईस आला आहे. अनेक लोक केवळ अंगठीवर लग्न आटोपत असल्याने कारागिरांना कामे मिळणे कठीण झाले आहे. बंगाली कारागीर त्यामुळेच गावाकडे परत गेले आहेत. - सारंग भालेराव, अध्यक्ष सराफ व्यापारी असोसिएशन, यवतमाळ