शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

२७२ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केले मुंडण

By admin | Updated: June 12, 2017 02:06 IST

जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात

दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त : जमिनी परत करण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : जलसंधारण विभाग चंद्रपूर, विदर्भ पाटबंधारे महामंडळ चंद्रपूर यांचेमार्फत प्रस्तावित केलेल्या प्रकल्पाच्या विरोधात दिंदोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने वेळाबाई नदी संगमस्थानी विठ्ठल रूख्माई मंदिर परिसरात मुंडण सत्याग्रह केला. यात २७२ शेतकऱ्यांनी मुंडण करून शासनाचा निषेध करीत आपले केस नदीपात्रात अर्पण केले.१९९९ पासून निप्पान डेन्रो या वीज प्रकल्पासाठी पाण्याची गरज असल्याचे भासवून यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा-बेला नदीकिनारी येणाऱ्या ३२ गावातील सुमारे एक हजार ५०० हेक्टर जमिनी शासनाने अल्पदरात संपादित केल्या. तथापि गेल्या १५ वर्षापासून या वीज प्रकल्पाचा थांगपत्ताही लागला नाही. आता अचानक २०१६ मध्ये याच अधिग्रहीत जमिनी जलसंपदा विभागाला परस्पर हस्तांतरीत केल्या. याबाबत प्रकल्पग्रस्त बाधित शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वसुचना देण्यात आली नाही. भूमिअधिग्रहण कायदा २०१३-१४ नुसार पाच वर्षात संपादित जमिनीवर प्रस्तावित प्रकल्प उभा झाला नाही, तर त्या जमिनी शेतमालकास परत करण्याची तरतूद आहे. पण १५ ते २० वर्षापासून दिंदोडा प्रकल्पासाठी अधिग्रहीत केलेल्या जमिनीवर कोणताही प्रकल्प न झाल्यास संबंधित जमिनीचे अधिग्रहण रद्द करून त्या सन्मानाने संबंधित शेतकऱ्यांना शासनाने परत करावे किंवा भूमिअधिग्रस्त कायदा १८९४ शासनाने रद्द केला ते भुसंपादन रद्द करावे, अशी आंदोलकांची मागणी आहे.