शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांसाठी हवे २४५ कोटी

By admin | Updated: January 9, 2016 02:54 IST

पावसाअभावी खरीप हंगाम बुडाल्याने दुष्काळात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

यवतमाळ : पावसाअभावी खरीप हंगाम बुडाल्याने दुष्काळात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी २४५ कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. शेतकऱ्यांना मदतीच्या या रकमेची प्रतीक्षा आहे. सरासरी पीक आणेवारी ५० टक्क्याच्या आत आल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला. पीक बुडालेल्या शेतकऱ्यांना आता दोन हेक्टरपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. सुमारे साडेचार हजार रुपये प्रति हेक्टर मदत गतवर्षी दिली गेली होती. यंदाही हाच निकष कायम राहण्याची शक्यता आहे. गतवर्षी २४५ कोटी रुपये मदत वाटपासाठी प्राप्त झाले होते. यंदाही तेवढीच रक्कम लागणार आहे. जिल्ह्यातील दोन हजार ५३ गावांमधील शेतकऱ्यांना ही दुष्काळी मदत मिळणार आहे. नजर आणेवारीच्या पहिल्या टप्प्यानुसार नऊ लाख रुपयांची मागणी केली गेली होती. मात्र त्यातही केवळ पाच लाख मंजूर करण्यात आले. आता मदतीचे आणखी दोन टप्पे राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नेमकी किती रक्कम मदत वाटपासाठी हवी याची मागणी नोंदविली जात नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणेही शक्य झाले नाही. त्यामुळे सहकारी बँकेपुढे पुढील कर्जासाठी आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण सक्तीची कर्ज वसुली बंद आहे. (जिल्हा प्रतिनिधी)